शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code
Showing posts with label येसन. Show all posts
Showing posts with label येसन. Show all posts

Monday, March 7, 2022

येसन एक मर्यादा

 येसन


येसन एक मर्यादा


महाराष्ट्रातील घाटी प्रदेशातील एका गावातील एका घरात सोप्यात दोन चार स्त्रिया एकत्र येऊन बसलेल्या आहेत. सोप्यातील खिडकीतून सूर्याची प्रकाशाची किरणे सोप्यात पसरली आहेत. घरातील गृहिणी आपल्या मुलीचे नाक टोचण्याचा खटाटोप करत आहे. तिच्या मदतीला शेजारची पार्वती आली आहे. जी मुलींचं नाक टोचण्यात तरबेज आहे. सोप्यात पलंग आहे. पलंगावर सूनिताची सासू बसली आहे. भली मोठ्ठी वाकळेची सुई बघून ती मुलगी जरा घाबरलेली आहे.नाक टोचताना पाहून सूनिताचा लहान मुलगा आडवे येत आहे. त्याला वाटते की आपल्या बहिणीला उगाच त्रास देत आहेत. तो मागून आई व पार्वतीस गुच्यांचा प्रसाद देत आहे ते बघून सुनीता चुलितील लाकूड त्याला दाखवते. तो घाबरतो व पळून जातो. व या आपल्या कामास लागतात.

वैदेही, “नको.. ग आई, दुखेल ग. केवढी मोठी सुई घेतलीय बघ ती.”

सुनिता, “ही काय सगळीच घालणार नाही तुझ्या नाकात, थोडीच घालणार टोचण्यापुरती.”

तारा आज्जी, “आग, छोटी सुई घ्या म्हणजे कमी दुखेल, तो शिलाई मशीनचा डब्बा आणा दिवळीतून,”

पार्वती उठून जाते व दिवळीतून डब्बा आणते. त्यातील सुई काढून नाक टोचू लागते. नाक टोचताना वैदेही दंगा करू लागते. तेव्हा तिची आई तिला दाबून धरते व इतर दोन बायका मदत करतात. पार्वती तीच नाक टोचून त्यात दोरा ओवते व छोटीशी गाठ मारते.नाक टोचल्यावर त्यावर तेल व कुंकू लावते. व खोड्यात टाकलेल्या जनावराने सुटकेचा श्वास सोडावा. तसा सोडून ती आजीजवळ येऊन बसते. थोड्याशा वेदना तिला जाणवत असतात. ती आजीला म्हणते,

“आजी नाक का ग टोचतात.”

आजी, “ बाळा मुलींचं वाकड पाय पडू नयेत. व तिच्या मर्यादा समजण्यासाठी, म्हणून नाक टोचतात.”

वैदेही, “ मुलींचंच  का मुलांचं पण टोचल पाहिजे.”

आजी, “ तस नाही बाळा मुलगा कितीही बाहेर उंडारून आला तरी त्यावर बंधन नसते. पण मुलगी जराशी जरी चुकली तर तिचं नाव खराब होत. तिचं लग्न होन अवघड होते. “

वैदेही, “ हे आपल बर आहे की सर्व बंधने मुलीलाच तिने कपडे असे घालावेत, टिकली लावावी. सातच्या पुढे घराबाहेर नको, वगैरे…”

आजी, “ वैदू बाळ मुलगी हीच घराची लक्ष्मी असते. घराची सत्ता व जबाबदारी ही. ती दोन घराण्याचं नेतृत्व करते. एकदा तिचं चुकीचं पाऊल पडल की तिच्या सासर व माहेरची मान प्रतिष्ठा धुळीस मिळते. चारित्र्यसंपन्न स्त्रीला समाजात पुरुषही आदबिनच बोलवतो.व चारित्र्यहीन स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वाईटच असतो.”

वैदेही, “ पण यासाठी नाक का टोचायच तसं पण आपण राहतोच ना.”

आजी, “ नाक टोचल्यान स्त्रीचं सौंदर्य वाढत . तसेच तिच्या नाकातील दागिना तिला नेहमी आरशात पाहताना तिची मर्यादा तसेच बोलतानाचा संयम पाळाय सांगतो. महाभारत द्रौपदीच्या उपहासात्मक बोलण्यातून घडले.”

थोड्याच वेळात जेवणखोलितून वैदेहीची आई येते. तिला, आजीला व बाकीच्या स्त्रीयांना शिरा खायला देते. तो शिरा घेत.

 वैदेही, “ अय्या शिरा, वा मला खूप आवडतो.”

सुनिता, “ म्हणूनच केलाय तुझ्यासाठी.”

वैदेही, “ असा रोज शिरा मिळणार असेल तर रोज नाक मी टोचून घेईन.”

सगळ्या बायका हसतात.

सुनिता, “ ये वेडाबाई रोज काय नाक टोचायला व शिरा करायला जमणार नाही. हा खा व जरा घर झाडायला मदत कर. मी आतल्या तयारीला लागते.”

 सुनिता आत स्वयंपाक घरात निघून जाते. व वैदेही शिरा खाऊन आजी व आपली आणि इतर बायकांच्या प्लेटा घेऊन जेवणखोलितल्या म्होरीतल्या भांड्यात ठेवते. सर्व घर झाडून काढते. म्होरीतील भांडी स्वच्छ घासून धुवून आणून ठेवते व आपले हातपाय धुवून मेकप करुन केस विंचरते. स्वतःला आरशात न्याहाळते. थोड्यावेळाने अंधार पडायला लागतो ती देवाजवळ सांजवात लावते. शुभं करोति म्हणून ती आपल्या शाळेतील अभ्यासास बसते. तिचे लहान भाऊ तिला चिडवतात.

“ येसण घातलेली ताई.”

तेव्हा ती त्यांना धपाटे घालायला जाते. तेव्हा ते पळून जातात.

…………….

काही दिवसानंतर तिच्या नाकात नथ घातली जाते. ती शाळेला जाताना रोज आरशात पहात असते. आपले सौंदर्य निरखत असते. ती आता सातवी पास झाली . गावाबाहेर माळावर हायस्कूल होते. तिथं तिचं एडमिशन तिच्या वडिलांनी केलं. ती चांगल्या मार्क नी पास झाली होती.

जून उजाडला पंधरा तारीख शाळेचा पहिला दिवस. वैदेही सर्व आटोपून आपल्या मैत्रिणीसवे हायस्कूलला निघाली. तिच्या मैत्रिणी तिला बोलवायला आलेल्या आहेत.

“ वेदू, अग वेदु येतेस ना, आवरलं की नाही तुझ.” शैलजाने हाक मारली.

वैदेही, “ थांबा आले आले.”

शाळेचं दफ्तर घेऊन बाहेर पडताना तिने आजी व आईला नमस्कार केला. आईने डब्बा दिला व नीट शाळेला जा म्हणाली. पुढील सोप्यात बसलेल्या वडिलांना नमस्कार करून ती आपल्या मैत्रिणीसंगे शाळेस निघाली. घराबाहेर आल्यावर तिच्या मैत्रिणी.

संध्या, “ किती संस्कारी बाळ आहे ना, वैदेही नमस्कार करून बाहेर पडते मोठ्यांच्या .”

शैलजा, “ हो तर पोटभरून आशीर्वाद मिळाला वाटतं.”

गिरजा, “ मिळाला तर असणारच संस्कारी आहे ती. तुमच्यासारखी नाही, तुम्ही केला का नमस्कार घरी कोणाला?”

संध्या, “ हो केला की.”

शैलजा, “ ये चला लवकर आधीच वेळ झालाय.”

सर्वजणी शाळेस जातात. शाळेस जाताना गावाबाहेर आल्यावर मेनरोडला लागल्यावर बरीच मुले शाळेस निघाली होती. काही अंतर चालल्यावर शेजारील गावची काही मुले सायकलिवरून त्यांना घासून ओरडत व खिदळत जातात. हुक्क्या घालतात.

थोड्या वेळाने त्या शाळेत पोहोचल्या. शाळेतल्या शिपायाकडे चौकशी करतात.

शैलजा, “ अहो, काका इयत्ता आठवीचा वर्ग कोणता?”

 शिपाई, “या लाईनेतून पुढे गेल्यावर उजवीकडे पाचवा वर्ग.”

त्या तिथे पोहोचल्या. वर्गाबाहेर व्हरांड्यात मुले दंगामस्ती करत होती.

त्या वर्गात पोहोचल्या. तेव्हा वर्गातल्या एका मुलाने पंखा चालू केला. पंख्यावरील रद्दीचे तुकडे ठेवलेले ते रंगीबेरंगी तुकडे त्यांच्या अंगावर पडू लागले. सर्व मुले ओरडू लागली. त्या कावऱ्याबावर्या होऊन एका बाजूच्या खिडकीलगत बेंचवर जाऊन बसल्या. थोड्या वेळानं घंटा झाली. शालेय प्रार्थना झाली. तास सुरू झाला. शिक्षक पुढे शिकवत आहेत. व वर्गातील पाटलाच्या अमोघचे लक्ष मुलीत बसलेल्या वैदेहिकडे आहे. इंग्लिश विषयाचा तास चालू झाला. वैदेहीच्या हातातील पेन खाली पडला. तो उचलण्यासाठी ती खाली वाकली. बेंच खालचा पेन घेताना तिला अमोघ पाहतोय हे जाणवले. तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

थोड्यावेळाने सुट्टी झाली. मुली वॉशरूमला गेल्या. वैदेही आपल्या मैत्रिणीसवे गेली. वरहांड्यातील मुले तिच्याकडे पाहून हसत होती.अमोघ व त्याचे मित्र पण त्याकडे पहात होते. नंतरच्या सर्व तासिका झाल्या. संध्याकाळी सुटीची बेल झाली. मुले घरला निघाली. तेव्हा परगावची मुलेपण निघाली. त्यांनी त्यांच्या सायकली काढल्या. व ती निघाली. अमोघने आपली सायकल काढली. व त्याने सायकल जाताना वैदेहीच्या जवळून घासून मारली. व मागे बघून तो हसला व निघून गेला. अचानक सायकल जवळून घासून गेल्यामुळे ती दचकली. व तिने पाहिले. तो अमोघ होता.

शैलजा, “ काय ग तो गोरा मुलगा कोण असल ग.”

संध्या, “ का ग.”

शैलजा, “ काही नाही दिवसभर लई नाटक चाललेत तेची.”

संध्या, “ तो होय पाटलाचा अमोघ होय.”

शैलजा, “ कुठल्या पाटलाचा.”

संध्या, “ वाडीच्या सदू पाटलांचा, आम्ही शेत करतो की तेंच.”

शैलजा, “ वाईट वळणाचा वाटतोय.”

संध्या, “ तसा नाही ग तो खूपच छान आहे. मी भेटले तेला कितीतरी वेळा माझ्याकडे कधी नाही पाहिल तेनं.”

शैलजा, “ तू काय अप्सरा आहेस काय? तुझ्याकडे बघायला. करापलेल तोंड तुझं.”

संध्या, “ मला नाव ठेवायला तू कुठं हिरोईन लागून राहिलीस.”

शैलजा, “ माझ्याकडं कशाला बघतोय ,(बोट दाखवत) हिच्याकडे बघत होता.”

वैदेही कावरीबावरी झाली. त्या आपापल्या पुढे घरी गेल्या.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मुले व्हरांड्यात खेळत होती. वैदेही व तिच्या मैत्रिणी शाळेत आल्या. त्यांनी वर्गात प्रवेश केला. त्या नियमित बेंचवर बसण्यास गेल्या. वैदेहीच्या बेंचवर काही फुले एका कागदात ठेवलेली दिसली. ती मोग्र्याची होती. वर्गातील व्हरांड्यात खेळणारी मुले ते पहात होती. ती फुले इतर मुलींनी पहिली व

शैलजा. “ कुणी आणलीत संधे तू का.”

संध्या, “ नाही, मी तुमच्या बरोबरच होते.वैदेही ने आणली तर नसतील.”

वैदेही, “ मी नाही.”

इतक्यात शैलजाचे लक्ष खिडकीकडे गेले. तिला वाकून खिडकीतून पाहणारी मुले दिसली. त्यांना बघून

शैलजा, “ आपली नव्हेत ही, उचलून ठेव बाजूला.”

संध्या, “ एवढ्या फुलांचा गजरा किती छान दिसेल.मीच घेते ती.”

संध्या फुले आपल्या बॅगेत ठेवते. इतक्यात इकडे मुले संध्याने फुले घेतलेली बातमी जाऊन अमोघला सांगतात.

“ अरे, ती फुले संध्याने घेतली.”

तो चिडून, “ तिला कुणी घ्यायला सांगितली. सगळा प्लॅन बेकार. एवढं श्रम केलं कुठून कुठून फुले गोळा केली. व सगळ व्यर्थ ,थांब त्या संधेला दाखवतो.”

……..

दुसऱ्या दिवशी शाळेस सुट्टी होती. शेताकडे जाणारी संध्या त्याला गाठ पडली. तिच्या केसातील गजरा पाहून तो आणखीनच चिडतो. व

अमोघ, “ काय संध्ये , फुलं लई माळलीस.”

संध्या केसांवर हात फिरवत, “ छान आहेत ना.”

अमोघ, “आहेत पण तुझ्यासाठी नव्हती ती.”

संध्या, “ म्हणजे मी नाही समजलो.”

अमोघ, “ ती वैदेही साठी होती. मी ठेवली होती ती; पण तू का घेतलीस. ती मला आवडते.”

संध्या, “ माफ कर हं, पण ती काहीच बोलली नाही. मला. व फुले पण घेतली नाहीत तिने.”

अमोघ, “ तिला माहित नाही अजून ती मला आवडते. व ती शैलजा असते ना नेहमी, बिचारी तिच्याच धाकात असते.”

संध्या, “ माझ्याकडे देत जा मी देईन तिला."

अमोघ, “ ठीक आहे, उद्या देईन मी. माझ एवढं काम केलीस ना की तुला पार्टी देईन बघ.”

ते दोघे निघून जातात.

… … … …

दुसऱ्या दिवशी अमोघ संध्याकडे गुलाबाचे सुंदर फुल देतो. संध्या ते गुपचूप आपल्या बॅगेत ठेवते. व वर्गात गेल्यावर वैदेही एकटी असताना देते.वैदेहीला गुलाब आवडतो, म्हणून ती तो डोक्यात माळते. वैदेहीच्या डोक्यातील गुलाब पाहून मुले गाणे म्हणू लागतात. ‘ फुल गुलाब का… … '

वैदेहीच्या डोक्यातला गुलाब पाहून शैलजा, ” वेदे गुलाब कुठला ग.”

वैदेही, “ संध्यांन दिलाय. तिलाच विचार.”

शैलजा, “ संध्या आम्हाला पण चालला असता की गुलाब.”

संध्या, “ आगं, कुणीतरी दिलाय गुलाब तो.”

शैलजा,” कुणी दिला ग येवडा चांगला गुलाब. काय कुठं डाका टाकाय गेलतीस का.”

संध्या, “ अमोघने दिला होता.वैदूला देण्यास ती तेला आवडते ना.”

अमोघ ने गुलाब दिल्याचे कळते व वैदेही कावरी बावरी होऊन तो डोक्यातून काढते. व बॅगेत टाकते.

व शैलजाकडे पाहु लागते.

शैलजा, “ वैदे काय चाललय, हूरळली मेंढी निघाली लांडग्याच्या मागणं.”

वैदेही. “ मला माहित पण नव्हतं . हिनच आणला वाटलं.”

शैलजा, “ संध्ये इथ शिकायला आलोय नको ते धंद करायला नाही.”

संध्या, “ मी काय केलय फक्त फुलच दिलंय नव्ह.”

शैलजा, “ होय फुल दिलंस त्याबरोबर काटापण आणलास नव्ह. उद्यापासून आमच्या बरोबर येऊ नकोस तू बाकीच्या मुली बोलतात ते खरच आहे तू अगोचरासारखी वागतेस ते.”

वैदेही खाल मान घालून उभा होती.

संध्याकाळ झाली शाळा सुटली. मुले घरला जाताना पाठीमागून मुले वेगाने सायकल पुढे मारतात. व हुक्या घालतात.

वैदेही घरी येते. आपले दप्तर हॉलमधील सोफासेटवर काढून ठेवते. व हातपाय धुवून स्वच्छ मेकप करते. सोप्या वरील दप्तर आजी कपाटात ठेवू लागते. तेव्हा तो गुलाब खाली पडतो. तो आजी उचलते.आजीच्या मनात … …

‘ गुलाब तो ही एवढा चांगला. कुठून आला असेल हिच्या मैत्रिणीकडे तर एवढं सुंदर गुलाबाच रोपट नाही. मग शैलेजाकडे विचारू. असे म्हणून आजी तो तसाच ठेऊन देते.’

आजीला दुकानाला चाललेली शैलजा दिसते ती तिला विचारते की वैदेहिकडे गुलाब कसा आला. की तू दिलास.

शैलजा, “ तिच्या मैत्रिणीने दिलाय तिला संध्येन, तिला तिच्या मित्राने दिला होता म्हणे.”

आजी, “ बरंय जा तू. मी बघते काय करायचं ते. नको ते वारं लागायच्या आधी उतारा केलेला बरा.”

… … … … …

रात्र होते. सर्वांची जेवणे होतात. आजीन आपल व वैदेहिच अंथरूण टाकल.

दिवळीतील तेलाची बाटली घेतली व त्यातील तेल हाताला व पायला लावले.

इतक्यात वैदेही तेथे आली. ती आजीचे पाय चोळू लागली. व आजीला म्हणाली. “ छान शी गोष्ट सांग.”

आजी, “ गोष्ट ऐकायला लहान नाहीस आता. “

वैदेही, “ तरी पण सांग की.”

आजी, “ मी आज तुला गोष्ट नाही सांगणार. पण एक सत्य सांगते.”

वैदेही कान देऊन ऐकू लागते.

आजी, “ हे बघ आपल्या गल्लीत खालच्या आळीत सदू बोर्ड्याची मुलगी आहे ना. ती आता इथच असते,”

वैदेही, “ती होय सुनिता ताई.”

आजी, “ हा तिच, शाळेत असताना ती खूप हुशार होती. तिला घरातून खूप सवलत मिळत असे.तेव्हा साधी नथ टोचून दिली नाही तिच्या आईन. तिचे सर्व हट्ट पुरवले. पुढे दहावी झाल्यावर कॉलेजला गेल्यावर तिन पळून जाऊन लग्न केलं एका मुलाबरोबर. आंधळ प्रेम पुढे त्याने एक मूल झाल्यावर तिला सोडून दिलं. एक छोटं मुलं व हिला सोडून तो पळून गेला. व शेवटी घरी संपर्क साधून घरलाआली.काय तो अवतार, पाच दिवस उपाशी होती. धड शिक्षण पूर्ण नाही. का इतर कष्टाच्या कामाची सवय.”

वैदेही, “ बर मग काय झालं ग.”

आजी, “ मग काय मक्यात, या घटनेवरून बाळा एवढंच शिकायचं, की तारुण्यात प्रेमाच्या नावाखाली नको ते उद्योग करू नये. आपल्या पेक्षा आपल्या घरातल्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. त्यानी चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात. त्यांचा दुनियादारीचा अनुभव जास्त असतो. हे बघ तिला घरी घेतलंच नसतं, तर तिचं काय झालं असते. यासाठी मुलींनी शिक्षणावर भर द्यावा. स्वावलंबी झाले पाहिजे. जर ती अर्धवट शिक्षण सोडून पळून गेली नसती तर आज एखाद्या चांगल्या पदावर नोकरी किंवा व्यवसाय तरी करत असती ही. आज तिच्या अर्धवट शिक्षणामुळे ती मजुरी करते. तिच्या भावजा सारख्या टोमणे मारतात. लाचार जगणं आलय तिच्या वाटेला.म्हणून तुला म्हणते की शिक्षणाकडे लक्ष दे. तू अस मला वाटत.”

वैदेही, “ बर.बाई .”

अस म्हणून ती झोपी गेली, रात्री आजीच्या सल्याचे विचार तिच्या डोक्यात घुमू लागले.

… … … … …. …

पाटलांचा अमोघ काही ना काही संध्येकडून पाठवायचा. कधी लॉलीपॉप, कधी बर्फी, तर कधितर लेमन गोळ्या , संध्याच्या हातातील ते पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटायचे. पण मनावर ताबा ठेऊन ती नकार द्यायची संध्या तिला बोलायची.

“ खायला काय झाले. तो देतोय ना? तुझे पैसे तर खर्च होत नाहित ना.”

 तेव्हा एखादा तुकडा त्यातून घ्यायचा. तो ही शैलजेपासून लपून. कारण आजी शैलजाकडे चौकशी करते ही बातमी छोट्या मोहन कडून समजली होती.

…. …. …. ….

एके दिवशी. शाळेत येताना संध्याकडून अमोघन चिठ्ठी पाठवली. संध्याने तिला ती दिली. छोट्या सुट्टीत सगळ्यांची नजर चुकवून ती बकुळीच्या झुडपात शाळेशेजारी वाचली.

मजकुर

       ‘ माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला पहात रहावेसे वाटते. उद्या रविवार आहे. शाळेस सुट्टी आहे. तू मला उद्या भेटायला ये गावाबाहेर माळावरच्या सिदू मुंबैवाल्याच्या आंब्याखाली मी तुझी वाट पाहतो दुपारी एक वाजता तू भेट. ‘

चिठ्ठी वाचताना तिचे काळीज धडधडत होते.काय करावे हे सुचत नव्हते. कधी नाही ती संध्या अभ्यासाला घरी संध्याकाळी आली. त्या दोघीजणी माडीवर गच्चीत अभ्यासाला बसल्या. शैलजाचे घर लांब असलेने ती येत नसे. अभ्यास करताना संध्याने आजूबाजूला पाहिले.

संध्या, “ काय लिहिलं होत ग.”

वैदेही, “ गप ग एवढी गणित करते.” (हळू आवाजात)

संध्या, “सांग की.”

वैदेही, “ भेटायला ये म्हणतोय.”

संध्या, “ जा की मग.”

वैदेही, “ सहजच बोलतेस की नाही ,मला भीती वाटते.”

संध्या, “ मी येते की सोबतीला, केव्हा बोलवलेय.”

वैदेही, “ दुपारी दोन वाजता मुंबईवाल्याच्या आंब्याखाली.”

संध्या, “ हे बघ जाऊया आपण मी सांगते. माझं काम आहे म्हणून.”

वैदेही, “ बघू ठरवलं नाही मी अजून.”

संध्या, “ चल जाऊया कायतरी खायला देईल की तो."

वैदेही, “ भुक लागलीय काय तुला, खा जा मग किलोभर भात.”

इतक्यात जिन्याच्या पायऱ्या वाजू लागतात. आजी गच्चीत येते. व धूणं काढते. व संध्याकडे बघते.

आजी, “ संध्या तू कवापासून अभ्यास करायला लागलीस. नाहीतर बघावं तेव्हा भुतावानी भटकतीस नुसती. बर करा अभ्यास.”

आजी धूणं घेऊन खाली जाते.

….. ….. ….. …..

दुसऱ्या दिवशी दीडच्या सुमारास संध्या वैदेहिकड येते. व माळावरच्या मंजुकडे जाऊन इंग्लिशच पुस्तक आणाय जाऊया का विचारते.

वैदेही, “ नको आता उनाच नंतर जाऊ.”

संध्या, “ नंतर मी शेण लावाय जाणार चल आताच जाऊ.”

संध्या, “ आजी मी वैदेहिला घेऊन जाऊ.”

आजी, “ जावा पण लवकर या.”

आजी वैदेहीकडे पाहत, “ जा ग तिच्या बरोबर एकटी कुठं जाईल उनाची.”

वैदेही आडे वेडे घेत तिच्यासोबत जायला निघाली. उनाचा भर चांगलाच होता. रस्ता सामसूम होता. गल्लीतून त्या पुढे गेल्या व मेन रोडला लागल्या पुढे वळणावर त्या दोघींना पाहून वर्गातल्या ज्ञान्यान आपली सायकल वळवली. व सुसाट सुटला.

वैदेही, “ संध्या तो ज्ञान्या का ग गडबडीने गेला असा तरकाटल्यासारखा.”

संध्या, “ काय माहीत चल तू.”

वैदेही, “ काय नाही कसं आपण मंजुकडेच चाललोय ना. "

संध्या, “ हो ग,चल , का आठवण झाली अमोघची.”

वैदेही, “ नाही मी ती चीठ्ठी केव्हाच फाडली.”

संध्या, “ कशाला फाडलीस तेला वाईट वाटलं की.”

वैदेही, “ वाटू देत, वाटल तर.”

संध्या, “ चल जाऊया. काय होत तेला भेटायला बोलवलंय ना.”

वैदेही, “ नको बाई मला भीती वाटते."

त्या पुढे कॉर्नेरला गेल्यावर माळावर जाणारा रस्ता लागला. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर ओढा लागला.

गावातला शंकरांण्णा बैलं धूत होता. एक बैल धुवून त्यानं कासरा आपल्या लहान मुलाकडे दिला होता. धुतलेले बैल शेजारच्या रानातील वैरण खाण्यासाठी तिकडे निघाला होता. तेव्हा शंकराण्णाने मुलाला सांगितलं बाळा कासरा वड बैल थांबेल. एसणीला इस्का बसला की बैलाला ताब्यात ठेवनं सोप जात.

येसन एक मर्यादा



ओढा पार करणाऱ्या वैदेहीच्या कानावर ते शब्द पडत होते. तिला आजीचे बोलणे आठवले. त्या पुढे ओढा पार करून गेल्या. थोड्या अंतरावर फाटा लागला. मंजूच्या घराकडे वळायचं सोडून संध्या दुसरीकडे वळताना पाहून.

वैदेही, “ आगं, इकडे कुठे.”

संध्या, “ चल गप्प. तो बघ त्या झाडाखाली अमोघ त्यानं तुला भेटाया बोलवले ना. मग चल की हे बघ त्यानं रेवड्या दिल्यात.”

 वैदेहीला संध्याचा विचार कळला. तिच्या हाताला हिसडा मारून ती

वैदेही, “ शैलजा म्हणत होतीच तू वाईट विचाराची आहेस.मला नाही यायचं तुझ्या संगे.”

वैदेही मागे वळली व घराकडे चालू लागली. ती परत जाताना पाहून अमोघ संध्याजवळ आला. व ती का गेली विचारलं. संध्या, “ ती भेटनार् नाही म्हंटली, मी तिला मंजुच्या घरला जायचं कारण सांगून आणली होती.”

अमोघ वेगाने सायकल घेऊन वाटेत तिला गाठतो. तोपर्यंत ती ओढा पारकरून गेली होती.

अमोघ, “ वैदेही, वैदेही.”

ती थांबली. व त्रासलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत.

अमोघ, “ हे बघ तू मला आवडतेस.”

वैदेही, “ मग मी काय करू,”

अमोघ, “ हो म्हण ना."

वैदेही, “ नाही, तू माझा विचार सोड, शिकायच्या वयात मला प्रेमाचा विचार नाही करायचा.”

अमोघ, “ मी तुला फुलासारखी ठेवीन.”

त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहतच राहिला.

…. ….. …

त्याच दिवशी संध्याकाळी शैलजा वैदेहीच्या घरी गेली. तिच्यासोबत एक मैत्रीण ही होती. त्या वैदेहिला घेऊन परसदारी गेल्या. तिथं एका झाडाखाली उभ्या राहिल्या.

शैलजा, “ माधवी सांग गं सर्वकाही.”

माधवी, “ वैदेही आमच्या वर्गात असणार्या नीताला ही तेन प्रेम आहे.अस सांगितल  व फसवल. सुरवातीस खाऊ देऊन तो गोड बोलत होता.ही बघ चिठ्ठी. खोटं वाटत असेल तर अक्षर तपासून बघ त्याच. त्याच्या गोड गोड बोलण्याला भुलू नकोस. तो तसाच सर्वांना झुलवतो.”

वैदेही दिवसभर संध्याचे प्रताप सांगते.

शैलजा, “ थांब संध्याला बघतेच.”

वैदेही, “ मी त्याच्या नादाला लागत नाही व संध्याच्याही. उद्यापासून आपण दोघीच शाळेला जाऊ.”

शैलजा व तिची मैत्रीण माधवी वैदेहिकडे चहा घेतात. व निघतात. वैदेही आपल घरकाम आटोपते व हातपाय धुवून स्वच्छ मेकप करते. त्यावेळी आरशात पाहताना आपल्या नथिकडे पहात. मनात म्हणते.

“ आजपासून चुकीचं पाऊल कधीच पडणार नाही."

दुसऱ्या दिवशी

त्या दोघी शाळेला एकत्र जाताना पाहून मागून संध्या हाक मारते. तेव्हा तिला वाटेतील एका झाडाखाली नेऊन

शैलजा, “ आम्ही सांगतो तस् वागत असशील तर आमच्या बरोबर ये. नाहीतर नको.”

संध्या झाल्या चुकीबद्दल क्षमा मागून उठाबशा काढते. व सोबत शाळेस जाते.

.शाळेत गेल्यावर त्यांना अमोघ व त्यांचा गँग एका बाजुला असलेल्या बाकावर शांत बसलेले दिसले. तेव्हा पासून सायकली पण शांत झाल्या. रस्त्याने हुकक्या न घालता अमोघ व त्याचे मित्र जाऊ लागले. व मुलींमध्ये एक वेगळा आत्मविश्वास आला.

लेखक - निशिकांत हारुगले

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...