( आरशात पहात)
सतिश :
काय रे बीट्ट्या गावात नविन पाखरं दिसाय लागल्यात.
बिट्ट्या :
व्हय र, नविनच आहेत. पावन्या हाईत वाटतं.
सतीश :
काय र सूरज ओळख करून घेऊया काय?
सूरज :
घेऊया की तेवढंच आपल जमलं तर जमलं रवी सारखं.
सतीश :
तस बघायला गेलं तर रव्यान चांगलच पाखरू पटकावलं.
बिट्टू :
तो रव्या काय पटकावतोय , मामा मुळेच घडलं समद. नाहीतर ती आरोही याला कसली भीक घालतेय.
सूरज :
मग आपणं पण बघू की
सतीश :
मग चला तर.
( त्या गाडी जवळून जाताना)
सतीश :
राम राम पावनी बाई, कुणीकडे चाललाय म्हणायच्या?
मानसी :
आरोही गोडांबे माहीत आहे का, आम्हीं त्यांच्याकडे आलोय.
सतीश :
आरोही वहिनीच्या तुम्ही कोण? म्हणजे पावन कोण अस म्हणायचं होतं.
माधवी :
आम्ही तिच्या मैत्रिणी आहोत.
बीट्ट्या :
मग काय लईच भारी. वहिनीच्या मैत्रिणी काय आमच्याच मैत्रिणी.
सुरज :
बघतोस काय बिट्टू पावण्या लांबून आल्यात. सिटीतनं, पाय भाजत असतील बिचाऱ्यांच बसवा गाडीत त्यांना.
माधवी :
नको नको त्याची काही गरज नाही.
बीट्ट्या :
नाही कसं, आमच्या गावात आलाय थोडा तरी पाहुणचार करु द्या की आम्हाला.
सतीश :
बोलत काय बसलाईस, उचल बॅगा अन् टाक गाडीत. बसा पावनी बाई.
( त्या गाडीत बसल्या. श्वेताला वागणं खटकल होत. पण तिने बाकीच्यांना गप्प रहाण्याचा इशारा केला. गाडी निघाली.)
सतीश ( आरशात बघत)
बीट्ट्या, पावणीबाई कुठल्या गावच्या म्हणायच्या.
बीट्टू :
आव कॉलेजला हाईत, कोल्हापूरकडल्या असतील.
सतीश :
आपल्याला कोल्हापूर लई आवडत राव. काय ते शहर, काय तिथंल जेवण, काय वातावरण लई भारी राव. अन् …
सूरज :
अन् तिथल्या लवंगी मिरच्या पण मस्तच असतील.
( ते हसू लागतात.)
सतीश :
बर पावनी बाई, गाव कसा वाटला?
मानसी :
आधी बघतो तरी, अजून येऊन टेकलो पण नाही. मग काय सांगणार….
बीटटु :
ते पण खरंच आहे म्हणा.
बीटटू :
मग असल की चार पांच दिवस मुक्काम.
माधवी :
चार पाच दिवस नाही. एक दोन दिवस आहोत.
बीटटू :
अस कस हे, आव् जरा बघा गाव हे, एकदा बघितल्यासा तर पुनः जायचं नाव काढायच्या नाहीसा.
श्वेता :
बर बघू, आधी लग्न तरी होऊ द्या.
सतीश :
कुणाचं?
श्वेता :
कुणाचं म्हणजे आरोहीच आणखी कुणाचं?
बीटटू :
आरोहीच होय, मला वाटल …
श्वेता :
काय वाटलं.
बीटटू :
काय नाही..... काय नाही....
( श्वेता रागाने पहाते. तो ओशाळतो, जिप गावात येते. एका वाड्यासमोर थांबते.)
सतीश :
हा आला तुमचा मुक्काम …उतरा खाली.
( त्या खाली उतरतात. आत वाड्यात जातात. तिथे अनेक जण आपापल्या कामात होती. आरोहिचा मामा, मित्र व रवी बसलेले होते. अंगणात अरोहिच्या मैत्रिणी पाहून )
आरोहीचे मामा :
राम राम मानसी मॅडम, तुम्ही आलात बरं झालं, अन् ह्या कोण?
मानसी :
या माझ्या मैत्रिणी ही श्वेता अन् ही माधवी.
सतीश :
मामा पाहुण्या पोहचवल्यात काळजी घ्या.
मामा :
तुमच्या सारखी दोस्त मंडळी असताना कशाला काळजी करू. बर आता गाव फिरणं थांबवा अन् जोडीदाराला घोडीवर बसवायच्या तयारीला लागा.
सतिश :
आम्ही आहोतच मामा, जरा आम्हाला पण घोडीवर बसवायची तयारी करा.
मामा :
पुढचा नंबर तुमचाच आता.
मानसी :
मामा आरोही कुठे आहे?
मामा :
असल आत खोलीत, जावा जरा. फ्रेश व्हा, विश्रांती घ्या. दमला असाल.
( त्या तिघी आत जातात.)
Cut to …
Day /Inter /Arohi mama home
आरोही पलंगावर बसली आहे. ती नाराज आहे. रडू लागते. तिची आई शेजारी बसलेली आहे.
आरोही आई :
हे बघ आपल्यावर मामाचे उपकार आहेत. तो काही शत्रू नाही.
आरोही :
तर लई मोठा हितचिंतक आहे. म्हणून मला मेहूनीच्या त्या बेवड्या पोराच्या गळ्यात बांधतोय.
आई :
तो एकुलता एक् व श्रीमंत आहे. तू सुखात राहशील.
आरोही :
त्याच्या पहिल्या बायकोला दिलं ना सुख त्यानं, मग का उडी घेतली विहिरीत तीन.
आई :
तुझ्या बाबत अस काही होणार नाही.
आरोही :
होणार नाही, म्हणून हा बिजोरा पाहिलास. मी स्पष्ट सांगून ठेवतोय तुला मला त्याच्याशी लग्न करायचं नाही.
आई :
गप्प बस , कोणतरी ऐकेल.
( मानसी व श्वेता तिथं येतात.)
अरोहीची आई :
तूच सांग आता समजावून.
मानसी :
तुम्ही जा बाहेर मी समजावतो तिला.
(आरोही मानसीला मिठी मारते. व रडते. माधवी व श्वेताला पाहून चकित होऊन काही बोलणार इतक्यात मानसी तिच्या तोंडावर हात ठेवत.)
मानसी :
गप बस. आम्ही तुला या पिंजऱ्यातून सोडवायला आलोय.
उगाचच दंगा करु नकोस. एक माझं.
( मानसी तिच्या कानात कुबुजत.)
आरोही :
अंग पण इथे कडक बंदोबस्त आहे.
मानसी :
तू गप्प ग, …. तू फक्तं फ्रेश रहा. शंका येऊ देऊ नकोस.
( आरोही फ्रेश राहण्याचे नाटक करू लागते, दिवसभर मेहंदी झाली. साखरपुड्याचे वेळी तयार होताना.)
आरोही :
श्वेता तुला या पेहरावात पाहून हसू येतय.
श्वेता :
का ग.
आरोही :
तुला नेहमी पुरुष पेहराव्यात पहायची सवय झालीय. ना.
श्वेता :
त्यात काय? हळूहळू होईल या पेहराव्याची देखील सवय.
आरोही :
काही म्हण, तू त्याच कपड्यात मस्त दिसतेस.
बर, सॉरी ह … मी तुमच्याशी नेहमी भांडतच राहिले.
माधवी :
सोड ग तो विषय आता पुढे जाऊ.
( रविचे मित्र अधून मधून लाईन मारण्याचा प्रयत्न करतात. संध्याकाळी हळदीचे जेवणं असते. गोड खीर केली जाते. श्वेता त्या खिरीत गुंगिच औषध नजर चुकवून टाकते. ती त्या तिघींनी जाऊन सांगते.)
श्वेता :
काही झालं तरी खीर खावयाच नाही.
Cut to .......
….. ….. …..
Night / inter / home
(लोक जेवू लागतात. जेवल्यावर सर्वांना झोप येते. श्वेता प्राजक्ताला मीस्क्वाल देते. प्राजक्ता गाडी घेऊन गावाबाहेर अड वाटेला मैत्रिणीसोबत येते. हॉर्न करते. या तिघी झटपट आवरून बाहेर पडतात. रवी व त्याच्या मित्रांनी खीर खाल्ली नाही. ते दारु प्यायलेले असतात. हॉर्न ऐकुण ते उठतात. बिबट्या त्या चौघिंना पळताना पाहतो. )
बीट्ट्या :
अरे भावांनो उठा लवकर. वहिनी पळाली.
( ते उठून मागे लागतात. गावाबाहेर झटापट करून त्या निघतात. रवी व त्याचे मित्र गाडी घेऊन मागे लागतात. वाटेत आश्विन आपली गाडी आडवी घालतो. त्याच्याशी फाईट करतो. तोपर्यंत प्राजक्ता व मैत्रिणी अरोहिला घेऊन जातात.. व आश्विन रवी व त्याच्या मित्रांना हरवून.गाडी घेऊन निघतो. रवी पाहतच राहतो.)
……….. ……..
Day / morning / inter / home
मामा व घरातील सर्व बसलेले आहेत.
रवी :
सोडणार नाही त्यांना.
मामा :
गप बस, पहिली नांदवता आली नाही, अन् दुसरीची स्वप्न बघतोय. पोरीच्या मनात नाही, तर उगाच जबरदस्ती कशाला. बघू दुसरी एखादी. कमल इकडे ये.
एक् काळी मुलगी येते.
मामा :
बघ चालती का?
रवी :
त्यापेक्षा मी बिन लग्नाचा राहीन. तो रागाने आत जातो.
मामा :
काय नवाबी नखरे. बस तसाच मग
…… …… …….
Next day / Cort / inter
जज्य समोर आरोही व राजेश चे कोर्ट मॅरेज होते. व सगळे जल्लोष करतात. प्राजक्त व आश्विन एकमेकाकडे पहात हसतात.
समाप्त