शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ९

 अस्तित्व पटकथा भाग ९

अस्तित्व पटकथा भाग ९ मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू ........


उमाचा रिझल्ट लागला. दहावी झाली. उमा व मैत्रिणी पास झाल्या. शाळेतून बाहेर पडल्या. घरी आल्यावर. उमा पाया पडू लागली.

आई, “ माझी गुणी बाय.”

गणपतराव, “ उमा तुला कॉलेज करत आश्रमात शस्त्र प्रशिक्षण देऊया का?”

शकुंतला, “ कशाला हवे पोरीच्या जातीला, उद्या नवऱ्याचे हात - पाय मोडायची. कायतरीच तुमचं आपलं.”

आजी, “ तिचं काय ऐकतोस. घाल पोरीला. शिकु देत.”

शकुंतला, “ लग्न झाल्यावर नवऱ्याच डोकं फोडून माहेरी नाही आली म्हणजे झालं.”

आजी, “ ती काही अर्ध्या डोक्याची नाही. अन् आली तर खाऊन संपणार नाही तिला आयुष्यभर इथं. इतकं हाय.”

शकुंतला, “मग बस घेऊन घरात.?”

ती रागाने आत गेली. आजीने गणपतराव ना इशारा केला.

….. …….

दिवसांची वेळ बारा वाजले. कॉलेजमध्ये फॉर्म भरायला गर्दी उसळली. उमाने कॉलेजमध्ये फॉर्म भरला. तसेच गुरुकुल मध्ये तिने शस्त्र व धार्मिक शिक्षण घ्यायला तिने सुरुवात केली. तिच्या मैत्रिणींना त्यांच्या घरातील मंडळींनी शिक्षण थांबवले होते. त्या फक्त कॉलेज करत असत. उमा आश्रमात शिकलेले सर्व ज्ञान आपल्या मैत्रिणींना रविवारी शिकवत असे. तिने चांगले मार्क मिळवले. व शस्त्र कला ही शिकली. तिच्या मैत्रिणींची मात्र दोन वर्षात लग्न उरकली गेली.

……….. …………..

सकाळची वेळ, मल्हारी घरातून गाडी घेऊन शेताकडे निघालेला होता. वाटेत एक स्त्रीने लिफ्ट साठी हात केला.

स्त्री, “ अहो, थांबा, थांबा.”

मल्हारी, “ काय हाय?”

स्त्री, “ मला थोडं पुढे सोडता का? बाकीच्या स्त्रिया पुढे गेल्यात. मला वेळ झालाय.”

मल्हारी, “ बरं, बसा.”

तो गाडी चालवू लागला. अचानक थोडं पुढे गेल्यावर त्या स्त्रीने त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मल्हारीने गाडी थांबवली.

मल्हारी, “ ये, चल उतर.”

स्त्री, “ अस काय हे , तुम्हाला काहीच वाटत नाही का?”

मल्हारी, “ मला काय वाटू अगर न वाटू देत, तू उतर खाली.”

ती गाडीवरून उतरली. मल्हारी गाडी घेऊन पुढे गेला. पण या सर्व धामधुमीत नदीला निर्माल्य सोडायला गेलेल्या पुजाऱ्याने पहिले.

….. ……. ……….

 मल्हारीचे वडील दुसऱ्यादिवशी सकाळी गावातून फेर फटका मारायला गावातून चाललेले होते. ते देवळात देवदर्शनासाठी गेले असताना. देवळात जाऊन घंटी वाजवून पाया पडले.

पुजारी प्रसाद देत.

पुजारी, “हा घ्या.”

सदाशिवराव, “ जी “

प्रसाद घेतल्यावर.

पुजारी, “मला थोड बोलायचं होतं.”

सदाशिवराव, “ बोला की.”

पुजारी, “नाही म्हटलं, मल्हारी आता मोठा झालाय, लग्नाचं बघता की नाही त्याच्या.”

सदाशिवराव, “ चाललंय पहायचं. बघू कुठे जुळते का?”

मधुकर पुजारी, “ तसं नाही, काल मी नदीहून येताना बसवण्णाची पोर बघितली मल्हारीच्या गाडीवर, तुम्हाला माहित आहे ना ती कशी आहे ती. नाहक बदनामी नको. वेळीच निर्णय घेतलेला बरा. “

सदाशिवराव, “बर झालं सांगितलं तुम्ही ते. तुम्ही पण बघा एखादं स्थळ. टाकू उडवून बार.”

पुजारी, “बरं, बरं, बघतो.”

सदाशिवराव, “ बर निघतो आता.”

पुजारी, “जी “

देवळातील घंटी वाजल्याचा आवाज होतो.

….. …… …….


सोमवार, १३ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ८

 अस्तित्व पटकथा भाग  ८

अस्तित्व पटकथा भाग ८,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू.......

संध्याकाळी घराच्या अंगणात आई, मल्हारी व मुले एकमेकास तेल चोळत होते. मल्हारी शेवटी होता. आई डोक्यावर मल्हारीच्या तेल घालत होती.

लक्ष्मीबाई, “ मल्हारी विचार न करता छोट्या छोट्या गोष्टींसाठी असा जीव धोक्यात घालणं बरं नव्हे.”

मल्हारी, “ आई, छोट्या गोष्टीतूनच मोठ्या घटना घडत जातात.”

लक्ष्मीबाई, “ लई, शहाणा आहेस.”

मल्हारी, “ शहाणा अस काही नाही. पण बुद्धिमान म्हणालीस तरी चालेल. जर आज मी हे धाडस केलं नसतं, तर रोज एखादा चोर घरी, दारी, रानात, शेतवडीत चोरी करू लागतील. डाके घालू लागतील. कारण एकदा मऊ लागलं. की बरेच ससे चरायला येतील.”

लक्ष्मीबाई, “बराच ठग आहेस की?”

 कार्तिक, “ ठग म्हणजे काय रे काका?.”

मल्हारी, ( कार्तिकाचे डोके चोळत) अरे, ठग म्हणजे असा हुशार माणूस जो तुम्हाला फसवून आपले काम फत्ते करुन गेलेला ही तुम्हाला कळणार नाही.”

 लक्ष्मीबाई, “बर चला खूप झाली तेल मालिश. मला खूप कामे आहेत.”

कार्तिक, “तू गप्प बस, कामे करतील आई व काकी.”

( सर्व हसू लागले.)

…… ….. …….

 स्वयंपाक घरात जेवण करत होत्या. एक भाजी चिरत तर दुसरी फोडणी देत होती.

सरस्वती, “पाहिलंस मामांजीनी घराण्याची चेन धाकल्या भाऊजींना दिली.”

पार्वती, “हो बघितलं. सासूबाईंचा लाडका आहे ना. खूपच लाड चाललेत.”

सरस्वती, “आमच्या यांना कळतच नाही. मागच सांगत होते वेगळे होऊ म्हणून. तर एक नाही की दोन नाही. या घरात जेवण करतच म्हाताऱ्या होऊ.”

पार्वती, “ तर काय, सगळा व्यवहार मामांजीकडे, आता तरी मुलांच्या हातात सत्ता द्या म्हणावं.”

सरस्वती, “आमचे हे उत्तम शेत सांभाळतील.”

पार्वती, “ आमच्या ह्यांना काय जमत नाही हो, पण द्यायला तर हवं.”

( इतक्यात स्वयंपाक घरात प्रवेश करत.)

लक्ष्मीबाई, “ झाला की नाही स्वयंपाक अजून.”

( त्या बोलणे थांबवून.)

पार्वती, “हो होतेय.”

लक्ष्मीबाई, “हा हात हलवा लवकर, ती मोलकरीण बाकीचे धुणे, पाणी , झाडलोट करते. तुम्हा दोघींना साधं जेवणही जमत नाही का लवकर करायला. काय माहेरी शिकवलच नाही.”

सरस्वती, “ हे काय, झालंच, थोडा वेळ आणखीन.”

लक्ष्मीबाई, “जेवण करताना बडबड कमी व हात हलवले की होते लवकर.”

लक्ष्मीबाई, “आणखी एक सांगायचंय तुम्हाला, व्यवहारचं म्हणाल तर, एकवेळ तुमच्या मुलांच्या हातात जाईल. पण तुमच्या नवऱ्यांच्या विसरा. साधं खंडभागाच्या शेतातून खंड मोजून आणता येत नाही. तिथं बाकीचा व्यवहार सोडाच. व राहता राहिला मल्हारीचा प्रश्न, त्याने दोन वर्ष नियोजन हाती घेतलं. म्हणून तुमच्या नवऱ्यांनी नको ते नाद करुन केलेली देणी भागवून घर चालवलं. तस पहायला गेल तर इथं त्या देण्याची तुलना करता तुमच्या वाट्याला एकर भर रान सुद्धा येणार नाही. घर भांडी सोडाच.”

लक्ष्मीबाई, “ तुमचा दीर प्रेमळ आहे, म्हणून नाहीतर एखाद्याने तुमचे हे थेर बघितले असते. तर केंव्हाच घरातून बाहेर हाकलले असते. त्या मुलांकडे पाहून सहन करतोय सगळं, त्यामुळे इथून पुढे जीभ सांभाळून.”

लक्ष्मीबाई, “आणखी चेनेच बोलत असाल, तर तो होता म्हणून ती चेन घरात आली. तुमच्या नवऱ्याच्या हातात असती तर आतापर्यंत नाचणारीच्या पायावर गेली असती. लागा कामाला.”

 सुनांना सुनावून ती बाहेर आली. हॉलमध्ये आल्यावर.

सदाशिवराव, “सुनांना बोलल्याशिवाय चैन पडत नाही का तुम्हाला?”

लक्ष्मीबाई, “त्या आहेतच त्या गुणांच्या, मघाशी चैन मल्हारीला दिली तेव्हा तोंड पहिलीत का त्यांची.”

सदाशिवराव, “स्त्री सुलभ सोन आवडायचं त्यांना.”

लक्ष्मीबाई, “मग या जावा म्हणावं माहेराहून घेऊन, नाहीतर नवऱ्यांना राबवा म्हणावं आपल्या, अन् घाला म्हणावं कमवून सोनं.”

सदाशिवराव, “शांत हो, ऐकलं तर काय वाटेल त्यांना.”

लक्ष्मीबाई, “वाटू देत काय वाटायचं ते, मला नाही येतं दया, लहान लहान मुले सासरी ठेवून माहेराला जाऊन चैन करणाऱ्यांना पायाखालीच ठेवलं पाहिजे. अन् हो तुम्हाला जर का एवढा पुळका असेल तर जावा आत मदतीला. तुम्हाला कामाला लावून बाजूला जाऊन बसतील त्या.”

इतक्यात शांताबाई तिथे आली.

शांताबाई, “ मालकीण बाई, थोडं पैसे हवे होते.”

लक्ष्मीबाई, “किती हवेत?”

 शांताबाई, “ दोन हजार.”

 लक्ष्मीबाई, “ थांब देते.”

लक्ष्मीबाई आत खोलीत जाऊन पैसे घेऊन आली. व तिला दिले.

लक्ष्मीबाई, “ हे घे, अन् हो जाताना बाहेरील बाकड्यावर केळी काढून ठेवली आहेत. जाताना जा घेऊन , नाहीतर जाशील तशीच.”

शांताबाई, “ बरं “

शांताबाई निघाली. जाताना केळी घेऊन गेली.

…… …. …….

क्रमशः पुढे 

रविवार, १२ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ७

 अस्तित्व पटकथा भाग ७


अस्तित्व पटकथा भाग ७,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू .....

उमेच्या गावापासून थोडं दक्षिणेत घाटी भागातील एक गाव सुर्यगाव, तेथे पाटीलवाडा, वाड्याला लागूनच तालीम होती. सदाशिवराव पाटील व लक्ष्मीबाई सद्गुणी कुटुंब. त्यांना तीन मुले. थोरला प्रतापराव त्याची पत्नी पार्वती. दुसरा जयसिंगराव त्याची पत्नी लक्ष्मी, तिसरा मल्हारी अविवाहित होता. जयसिंगरावस दोन मुले एक येसाजी दुसरा तानाजी, तर प्रतापरावास एक मुलगा कार्तिक व मुलगी अवंतिका व वासवी.

तालमीत मल्हारराव व त्यांच्या बरोबर तानाजी, येसाजी व कार्तिक व्यायाम करत होती. जोर काढून सूर्यनमस्कार घालत होती. गोठ्यात शांताबाई धार काढत होती. इतक्यात तिथे लक्ष्मीबाई आली.

लक्ष्मीबाई, “शांता… ये शांता… झाली का धार काढून?”

शांताबाई, “ हो झाली. आलेच. “

शांताबाई दूध घेऊन लक्ष्मीबाई जवळ आली. लक्ष्मीबाईंनी मुलांना हाक मारली.

लक्ष्मीबाई, “ मल्हारी, यारे सारे दूध आलेय.”

सर्वजण तिथे आले. लक्ष्मीबाईने दूध दिले. दूध पिऊन तोंडावर आलेल्या मिशा पुसत ते. “ वाह..” म्हणाले.

 लक्ष्मीबाई, “मल्हारी, काल विचारलेल्या प्रश्नाचं काय झालं.”

मल्हारी, “कोणता प्रश्न?”

 लक्ष्मीबाई, “ तुझ्या लग्नाचा?”

मल्हारी, “अजून मी तयार नाही त्यासाठी. “

लक्ष्मीबाई, “मग काय म्हातारा झाल्यावर घोडीवर बसणार का?”

मल्हारी, “ सांगतो नंतर. “

 त्याने गडबडीने कपडे घातली व तो बाहेर निघाला.

लक्ष्मीबाई, “मल्हारी ये एक की ……काय करायचं या पोराला.”

येसाजी, “आजी काका जर तयार नसतील तर माझं लावा की लग्न.”

 लक्ष्मीबाई, ( कानाचा गड्डा पिळंगाळत तो आई गं असा आवाज काढून)

अजून नाळ वाळलाय का? म्हणे माझं लग्न करा. चला पळा काकांबरोबर जा अंघोळीला.”

ते सर्वजण काकांमागे जात

सर्वजण,

“ काका थांबा,….. काका थांबा, …

असे ओरडत पळाले.

…….. …… …… ….. …..

नदीच्या वाटेला लागली. थोड्या वेळात नदीच्या बंधाऱ्यावर आल्यावर तिथे आपली कपडे ठेवून मल्हारीने पाण्यात उडी टाकली. व तो पोहू लागला. त्यापाठोपाठ इतर मुलांनीही उड्या टाकल्या. ती सुद्धा स्पर्धेत पोहू लागली. पोहत थोड्या अंतरावर असलेल्या बांबूच्या बेटास शिवून ते परतले. व दुसऱ्या बाजूच्या उंच आंब्यापाशी पोहोचले. तेथील आंबे तोडून घेऊन परत पुलावर आले. तिथे आणलेल्या पिशवीत आंबे ठेवले. पुन्हा उडी मारून पोहून स्नान केले. व पुन्हा कठड्यावर बंधाऱ्याच्या येऊन बसले.

तानाजी, “ आज तरी पूर्ण होतील का?”

येसाजी, “दोनशे झाले असतील.”

कार्तिक, “लोणचे जबरदस्त होईल ना?”

 मल्हारी, “हो “

मल्हारी, “हा आंबा खरा लोणच्याचा आहे. आजीला याचे आंबे खूप आवडायचे? आजोबा कायम पोहत जाऊन आणायचे.”

कार्तिक, “ व आता आपण आणतो.”

मल्हारी , “चला पोहणे झालं. जाऊया. “

ते आवरून जात असतात. इतक्यात त्यांना आवाज ऐकू आला.

एक स्त्री, “वाचवा वाचवा, माझ्या बाळाला वाचवा.“

ती सर्व आवाजाच्या दिशेने गेलीत. तिथे एक जंगली लहान कोल्ह्याने एका मुलावर हल्ला केला होता. त्याचे बाबा त्या कोल्ह्यास मारत होते. ती शेताला निघाली होती. ती मुलाचा पाय जो कोल्ह्याने धरला होता. तो सोडवण्याचा प्रयत्न करत होती. मल्हारीने एक दगड उचलला. व त्यास मारला. तस ते बाजूला रानात पळालं. ती तिथे गेली. त्या मुलाच्या पायाला दात लागले होते. त्यांची सुटका केल्यावर.

तानाजी, “कस केकटत पळालं. “

येसाजी, “ आपल्या काकांचा नेम आहेच भारी.”

स्त्री, “अगदी देवासारखं धावून आलात. नाहीतर काय खर नव्हतं.”

मल्हारी, “ काहीतरी हत्यार घेऊन यायचं. जवळ जंगल आहे. माहिती आहे ना.”

स्त्री, “ शेतात काम होत. म्हणून निघालो होतो. घरी कोण नाही . म्हणून सोबत आणलं याला. तर हे संकट पुढे वाढून ठेवलं होतं.”

मल्हारी, “ ते काम राहु दे. आधी त्याला दवाखान्यात न्यायला हवं.”

त्या मुलास घेऊन दवाखान्यात नेण्यात आले.

…… ….. …… ……..

मल्हारीच्या घरी जेवणखोलीत सर्व जेवायला बसले होते. जेवण वाढले जात होते. लक्ष्मीबाई जवळ बसलेल्या होत्या. जेवताना

कार्तिक , “ आजी काकांनी एक दगड मारताच पळालं बघ ते.”

लक्ष्मीबाई, “ हो का? तू काय केलंस मग?”

कार्तिक, “ मी त्या मुलाला उठवलं. त्याला कोल्हानं चावलं होत.”

लक्ष्मीबाई, “ अरेरे, खूप वाईट झालं. मग काय केलं.”

कार्तिक, “ त्याला दवाखान्यात नेलं. अन् डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन केलं बघ.”

लक्ष्मीबाई, “ तुला नाही केलं?”

कार्तिक, “ मला कशाला टोचतील?”

लक्ष्मीबाई, “ जास्त बोलतोस म्हणून.”

मल्हारी, “ बरं, आता कौतुक पुरे, जेवा आता.” “ आई , बाबा कुठे आहेत?”

 लक्ष्मीबाई, “ ते होय, गेल्यात महादेव कोळ्याच्या पोरीच्या लग्नाला. “

ते जेवू लागले.

…… …… ……..

वस्तीवर एका घराच्या दारात मांडव होता. अनेक लोक जमले होते. अक्षता टाकल्या. लग्न झाले. सदाशिवराव नवरीच्या बाबाला भेटून बोलत होते. वधू वराने त्यांचा आशीर्वाद घेतला.

महादेव, “लई कृपा झाली. आज तुम्ही होता म्हणून हे लग्न झालं. नाहीतर माझ्या गरिबाच्या पोरीला कुणी करून नेलं असतं.”

सदाशिवराव, “ त्यात काय एवढं, तुम्ही लोक श्रीमंती व पैसा पाहून मुलगी देण्याचा प्रयत्न करता. मुलगा जर कर्तबगार असेल तर तो पैसा कमावतोच. अन् नालायक असेल तर दवडतो, आपण चांगली पारख करुन घ्यावी. माझं ऐकलास म्हणून बरं, नाहीतर धोखा खाल्ला असतास. आता बघ मुलगी राहिली ना नजरेसमोर, अन् मुलगाही चांगला मिळाला. बरं निघतो मी राम राम…”

 महादेव, “राम राम …..”

तेथून गाडीवर बसून आपली टू व्हीलर घेऊन जाताना वाटेत एक तार खेचल्याने गाडीवरून तोल गेला. इतक्यात तिथे चार काळेशार माणसे आली. एकजण, “चल काढ ती अंगठ्या व चेन.”

दुसरा, “बटवा पण दे.”

सदाशिवराव सावरत उभे राहिले. दोघेजण त्यांना पकडून तिसरा, त्यांचे चेन, अंगठी, बटवा काढून घेतो. इतक्यात एक शीळ ऐकू आली. त्यातील एकजण, “चला रे. कोणतरी येईल.”

सदाशिवराव अंदाज घेऊन त्यांच्याशी प्रतिकार करायचे थांबवून त्यांना.

सदाशिवराव, “ सर्व घ्या, पण ती चेन तेवढी द्या.”

लुटारू, “ ऐ चल, देत नाही जा.”

सदाशिवरावांना ढकलून ते झाडीतून लपून बाजूला गेले. दिसेनासे झाले. सदाशिवराव अडखळत उठले. इतक्यात तिथून गाडीवरून निघालेला एका पांथस्थाने सावरण्यास मदत केली. ते आपली गाडी घेऊन निघाले.

…… ……. ….

वाड्याच्या आवारात गाडी लावून सोफासेटवर बसले. त्यांचा अवतार पाहून लक्ष्मीबाई जवळ येऊन

लक्ष्मीबाई, “ काय झालं. “

सदाशिवराव, “ काही नाही, वाटेत काही भुरट्या चोरांनी हल्ला केला. व अंगठ्या, चैन, पैसे सर्व लुटून नेले.”

लक्ष्मीबाई , “ अरे देवा, ते आणखी कुठून उलतले.”

इतक्यात एका गड्याच्या पोराने ही बातमी ऐकली व ते धावत पळत बाहेर सर्वांना सांगायला गेले.

गड्याचे पोर, “ अरे , समजलं काय, थोरल्या पाटलांवर हल्ला झाला. त्यांना लुटलं. सोन नाण सगळं घेतलं.”

 गल्लीतल्या एका जणाने ही बातमी ऐकली. व तो धावत कट्ट्यावर गेला. जिथे मल्हारी बसला होता. तिथे तो सांगत गेला.

एकजण , “अरे मल्हारी, ऐकलस का? तुझ्या बाबांवर हल्ला झाला वस्तीवरुन येताना अचानक काही लुटारूंनी लुटलं म्हणे, त्यांकडीला सर्व सोन नाणे काढून घेतलं म्हणे.”

मल्हारी, “काय?”

 दुसरा एकजण, “आजकाल सारखं चाललंय. वाटेला वाटमारी होतेय.”

तिसरा व्यक्ती, “ ते आलेत ना, जंगलात राहिलेले भटके त्यांचेच काम असणार.”

मल्हारी, “ च्या मायला, दाखवतोच इसका.”

मल्हारी व मित्र मल्हारीच्या घरी आले. सोफासेटवर बसलेल्या सदाशिवरावांना वारा घालत होते. त्यांना पाणी आणून दिले गेले. काळजीने.

लक्ष्मी, “सगळं ठीक आहे ना? असा कसा हल्ला केला त्यांनी. सांगत असते एकटे जात जाऊ नका म्हणून वय झालंय आपलं.”

सदाशिवराव, “ लूटमार झाली त्याचं काही वाटत नाही. ते काय पोटासाठीच करतात. पण आपली परंपरागत वंशावळीची चेन काढून नेली. त्याचं वाईट वाटतं. मी अडवलं , पण ऐकलं नाही त्यांनी. पूर्वजांची निशाणी होती ती.”

 मल्हारी रागाने उठून बाहेर गेला.

सदाशिवराव, “आडवा तेला, गरम डोक्याचं पोर, काहीतरी भलतंच करील.”

लक्ष्मीबाई, “मल्हारी, मल्हारी,”

मल्हारी बाहेर पडला व आपल्या मित्रांना इशारा केला. सर्व आपल्या गाड्या काढून निघाले. त्यांनी खंजीर, चाकू, छोटी बंदूक घेतली होती. ते घटना स्थळावर आले.

मल्हारी, “ कुठ हल्ला झाला?”

 राकेश “ ते बघ, तिथे गाडी घसरल्याचे निशाण.”

 अजित, “ गाड्या लावा झाडीत.”

मल्हारी, “ नको, थांब तू व सुरेश वताडाच्या बाजूने गावमिरीच्या जंगलातून वर जा. तिच वाट जंगलातून बाहेर जाते. आम्ही इकडून येतो.”

मल्हारी व राकेश जंगलातील पायवाटेने पुढे चालत गेले. वेगाने पुढे गेले.

मल्हारी, “ राकेश झऱ्याचे उगमाकडे जाऊया.”

राकेश, “बरं.”

ते त्या रान वाटेने निघाले. हिरव्या झाडीतून वाट काढत जाताना जंगलातील पक्षांचा आवाज कानी पडत होता. पाय वाटेने नाला पार करुन जाताना दूर धूर दिसला.

राकेश, “ मल्हारी तिकडे.”

मल्हारीने पाहून इशारा केला. ते रानातून हळूहळू निघाले.

(सापळा लावून त्यात सापडलेली कोंबडी शिजवून ते चोर खाऊन दारू ढोसून पडले होते. मल्हारी व राकेश त्यासमोर गेले.

त्यातील एकजण लपवलेले हत्यार उचलण्यास गेला. ते उचलून घेत असताना, राकेशने बंदुकीचा बार काढला.

मल्हारी, “ ज्यादा शहाणपणा नको. मला बाकीचं काही नको. थोड्यावेळापूर्वी लुटलेलं सोनं व ती चेन तेवढी द्या. आम्ही जातो.”

एकजण, “ तुला काय येडं वाटलाव लुटीचा माल द्यायला.”

 दुसरा, “तुझ्यात जर हिंमत असेल तर या रिंगणात टाकतो माल, घेऊन दाखव.”

( त्याने एक रिंगण आखले. त्यामध्ये एका रुमालात लुटलेला माल टाकला. त्यामध्ये असलेले आभूषण ती चेन मल्हारीने ओळखली. ती घेताना त्यांच्यात हातघाई झाली. मल्हारीने त्या तिघांना लोळविले. इतक्यात त्यांचे इतर साथीदार आले. मल्हारीच्या मित्रांनी पाहून लगेच एक आपट बार काढला. तसे ते मागे सरले. मल्हारीने ते दागिने उचलले. व मागे सरत तो व मित्र निघाले.)

……….. …………..

मल्हारी गाडीवरून दारात पोहोचला.

येसाजी, “काका आला, काका आला.”

मल्हारी घरात आला. वडील सोफासेटवर बसले होते. त्यांपुढे ती चेन व अंगठ्या सादर करून.

मल्हारी, “ हा घ्या.”

सदाशिवराव, मल्हारी, विचार न करता असा जीव धोक्यात घालणं बरं नव्हे.”

मल्हारी, “बरोबर आहे, पण आपली कष्टाची कमाई असं कोणी हिरावून नेत असेल व आपण गप्प बसने ते ही योग्य नाही.”

लक्ष्मीबाई, “गेलेलं धन परत मिळवता येतं.”

मल्हारी, “ वंश परंपरागत हे आभूषण मात्र परत मिळाले असते का?”

सदाशिवराव, “ हो ते ही खरंच, तू आज आपल्या घराण्याची अस्मिता पुन्हा परत आणलीस. यावर आजपासून तुझा हक्क. मी ही जबाबदारी तुला सोपवतोय.”

सदाशिवरावांनी मल्हारीच्या गळ्यात ती चेन घातली. ते पाहून त्यांच्या इतर सुनानी तोंड काळे करुन नाक मुरडले. व आपल्या खोलीत त्या निघून गेल्या.

….. …… ……

क्रमशः पुढे......


शनिवार, ४ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ६

 अस्तित्व पटकथा भाग ६

क्रमशः पुढे चालू.....

कडक उन्हाळ्याचे दिवस होते. चैत्राचा महिना, कोकण (अपरान्त) देशातून एक साधू व त्याचे दोन शिष्य घाटमाथ्यावरून जंगलातून दक्षिण कुंतल ( कोल्हापूर जिल्हा दक्षिण भाग) प्रदेशात पायी चालत निघाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणवठे आटले होते. खूप चालल्याने वृद्ध साधूस खूप थकवा आला होता. वाटेत कुठेही पाणी मिळाले नव्हते. पुढे गाव आहे याची चाहूल लागली. व पाण्याच्या आशेने ते गावाकडे निघाले. ते उमाचे गाव होते. वेशीबाहेर ते शेताजवळ आले. अचानक साधूला भोवळ आली. शिष्यांनी त्यांना झाडाखाली नेले. ते तहानेने व्याकुळ झाले होते. शिष्य गुरूंना पाणी आणण्यासाठी इकडे तिकडे पाणी मिळते का शोधू लागले. तेव्हा त्यास रहाटेचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने तो गेला. तिथे उमा शेतातील औतवाल्यासाठी जेवण घेऊन आली होती. ती पाण्याची कळशी घेऊन पाणी आणायला आडावर आली होती. साधूंचा शिष्य तिच्याजवळ गेला. ती शेताकडे निघाली होती.

शिष्य , “ थांबा, थोड थांबा.”

तिने मागे वळून पाहिले.

उमा, “ कोण आपण? काय काम आहे.”

 शिष्य, “ माझ्या गुरूंना खूप तहान लागली आहे. तहानेने त्यांचा जीव कासावीस झाला आहे हो. थोडं पाणी पाजा.”

उमा, “चला, देते.”

उमा आपली कळशी घेऊन गेली. व त्यांना पाणी दिले. पाणी प्यायल्यावर त्यांना बरे वाटले. उमाने वाकून नमस्कार केला. तेव्हा साधूंनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांना भूत, वर्तमान , भविष्य दिसत होते. त्यांनी उमेला बसायला सांगितले.

साधू, “बाळ, इथे बस.”

उमा खाली बसली. साधूंनी तिच्या दोन्ही डोळ्यांच्या भुवयांच्यामधी आपला अंगठा ठेवला. ओम उच्चार केला. उमेच्या शरीरात अंतर्गत प्रवाह जागृत झाला. ती एकदम शांत झाली. उठून तिने पुन्हा नमस्कार केला. व ती आपली कळशी घेऊन निघाली.

….. …… …….

 उमा गेल्यावर शिष्यांनी साधूला विचारले.

शिष्य, “ स्वामी आपण त्या मुलीला कोणता मंत्र दिलात.”

साधू, “ बाळ मी तिला मंत्र नाही. तर तिच्या भविष्यासाठी तिच्यातील ऊर्जा शक्ती जागृत केली. जिच्या जोरावर ती आपले रक्षण करेल. व आता ती शिवमय आहे.”

 शिष्य, “ पण हे सृष्टीच्या नियमात आहे का? ती त्याचा दुरुपयोग करणार नाही ना.”

 साधू, “ अशक्य, जी भर उन्हात त्रास घेऊन सिंधलेले पाणी स्वतः न पिता इतरांना देते. ती देवस्वरूप असते. अन् मी काही नियम भंग केला नाही. तिने थंडगार जल देऊन माझी तृषा शांत केली. मी तिची थोडी मदत केली. चला पुढे जाऊ.”

त्यांनी पुढे प्रस्थान केले. शेतात उमा आली. तिने पाणी व जेवण औतवाल्यास दिले. त्या दिवसापासून उमाचा स्वभाव बदलला. ती खूप शांत राहू लागली. कुणालाही उलट बोलणं तिचं बंद झालं. घरातील सर्व कामे ती व्यवस्थित कुणी न सांगता करू लागली. शाळेत देखील खूप शांत वावरू लागली. तिच्या वागण्याचे घरातील, गावातील व शाळेतील सर्वांना आश्चर्य वाटत होते.

एके दिवशी घरात बसल्यावर.

शकुंतला, “ अहो पाहिलत का? देव पावला म्हणायचा. आपली उमा किती शांत झालीय. कोणत काम सांगाव लागत नाही. सर्व करते. जेवण सुद्धा मस्त करते. खूप गुणी झालिये हो.”

आजी, “हो, गुणी असणारच, नाहीतर तुला पोळ्या तरी करता येतात का? म्हणे उमा गुणी आहे. हाताखाली मोलकरीण हवेय, म्हणजे ही मिरवायला रिकामी.”

शकुंतला, “ अहो, सांगा तुमच्या आईला. मी काही बसून खात नाही.”

आजी, “तो काय सांगतोय बैलोबा, मी आहे घट्ट अजून, उमाला चांगलं. स्थळ मिळत नाही. तोपर्यंत काही आकसत नाही. म्हणे जेवण चांगली करते?”

 शकुंतला टाचा आपटत आत गेली.

 गणपतराव , “आई, अस बोलायला हवं का? बघ ती चिडली. घरात आता कुठं सुरळीत चाललय. वाद कशाला?”

 आजी, “मी वाद घालते. तिच काहीतरी म्हटली असणार. काय जादू केली कुणास ठाऊक. की मंतर फिरवला. माझी खेळत्याली बाहुली शांत झाली. घर कसं खायला उठतं.”

गणपतराव, “बाहेर होतीस देवळात, तेच बरं होत बघ.”

 आजी, “देवळातच जाते, अजून मसनात जायला खूप लांब आहे हा. म्हणूनच हा अंगारा आणलाय.”

( लहान नातवास.)

“ बाळ, हा घे महादेवाचा अंगारा. जा लाव तुझ्या ताईला. घालू देत तांडव. अजून लहान आहे ती.”

गणपतराव, “ अगं आई, आता सोळा वर्षाची आहे ती. लहान कशी. व आपली उमा गुणी आहे. मिळेल चांगला नवरा तिला?”

 आजी, “ गुणी हाय, म्हणूनच दृष्ट लागली पोरीला. “

( हात पूर्वेला जोडून.)

“ देवा, महादेव लक्ष ठेव बाबा पोरीवर.”

( पदराने आपले अश्रू तिने पुसले.)

…… …… …………

क्रमशः पुढे 

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ५

 अस्तित्व पटकथा भाग ५


संध्याकाळ झाली, जगन त्याच्या गुंगीतून बाहेर आला. त्याचे डोके जड झाले होते. त्याच्या आईने त्याला चहा दिला.

जगन , “ आई गं.”

आई, “ काय झालं बाळ.”

जगन, “ डोक दुखतंय.”

आई, “ दुखणारच. तू काय खाल्लस.”

जगन, “ प्रसादाचा शिराच खाल्ला , पण जरा चव वेगळी होती.”

आई, “ त्या पोरींनीच काहीतरी घातलं असणार. त्या पोरींपासून लांब रहात जा हो.”

बाबा, “ उगाच लोकांच्या पोरींना कशाला बोलतेस, यान चोरुन शीरा खाल्ला. आंबे चोरले. तसेच कुठून तरी ढोसली असेल. व घालतोय त्या पोरींच्या नावावर.”

जगन, “ बा, तुला म्या कितीही ओरडून सांगितलं तरी पटायचं नाय.”

बाबा, “ पटेल कसं, सगळं समोर दिसतंय.”

( जगन रागाने उठून गेला.)

 आई, “ आर, जगन्या जेवून तरी जा.”

जगन, “घाल, तुझ्याच नवऱ्याला.”

बाबा, “ जाऊ देत, पोटात कावळे ओरडायला लागले की येईल परत.”

….. …… ….. ….. …..

 जगनला उमा व तिच्या मैत्रिणींचा राग आला. त्यांच्या कारस्थानात आपण सापडलो यामुळे तो खूप चिडला होता. त्याने त्यांना अद्दल घडवण्याचे ठरवले होते. त्याने आपले मित्र प्रल्हाद व मोहन यांच्या मदतीने सकाळी रानात जाऊन कावशीची वेल शोधून त्यावरील कावशी पळस पानात घेतली. व आला. शाळेत सगळ्यांच्या आधी जाऊन त्याने त्या मुलींच्या जागेवर कावशीचे तंतू टाकले. व बाहेर खेळायला गेला.

उमा व तिच्या मैत्रिणी शाळेत आल्या. आपल्या जागेवर दप्तर ठेवले. व प्रार्थनेला गेल्या. प्रार्थना झाली. त्या वर्गात आल्या. तासिका सुरु झाली. घाटपांडे सर आले होते. त्यांनी हजेरी घेण्यास सुरवात केली.

घाटपांडे सर, “चला हजेरी द्या.”

 मुले शांत बसली.

घाटपांडे सर, “ सचिन पाटील, “

सचिन , “येस सर.”

“ उमा पाटील, जयश्री गायकवाड, लता कुंभार, जगन मोरस्कर.”

जगन , “ येस सर.”

 जगन चे नाव घेताच सर जगनला म्हणाले,

“काय जगन कालची उतरली की नाही. जरा शाळेत नीट वागत जा.”

जगन खाली मान घालून उभा होता. सर्व मुले हसत होती. मुली पण हसत होत्या. उमेला हसताना पाहून, जगन मनात,

“ मला हसताय काय? कळेल थोड्या वेळात, चांगल्या रडशीला.”

सर, “ चला आज आपण मराठीचा पाठ पाहणार आहोत. गुळ हरियाचा सिद्धांत, ही एक लीळाचरित्रातील लीळा आहे. ज्यामध्ये …..”

थोड्या वेळाने मुलींना खाजवायला सुरुवात होते. त्या एकमेकींकडे पाहत इशारे करू लागल्या. जगन शांत बसलेला होता. राजश्रीला सहन होत नव्हते. ती खाजवत उठली.

राजश्री, “ आई गं, खूप खाजवतेय. सर कुणीतरी खुजली टाकलेय बघा.”

लता, “ सर, खरंच कुणीतरी टाकलेय, सगळ्या अंगाला खाज सुटलीया.”

 सरांची परवानगी काढून त्या खाजवतच वर्गातून बाहेर पडल्या. व घरच्या वाटेला लागल्या. खाज खूप सुटली होती. वाटेत जाताना.

प्रभा, “ आई गं, मेलो मेलो.”

लता, “ कुणी टाकली असल गं.”

उमा, “ दुसर कोण, वर्गात किडा एकच.”

 जया, “ कोण जगन्या.”

हेमा, “ नाहीतर काय मुळावरच आलाय मुडदा आमच्या.”

लता, “जगन्या सोडणार नाय तुला.”

जयश्री, “ आता काय करूया गं, लईच खाजवतंय.”

लता, “चला, मांगीर बाबाकडं तोच दिल झाडपाल्याचं औषधं.”

त्या गावातील वैद्याकडे गेल्या. वैद्यबुवा पडवीत विश्रांती घेत होते. तिथे गेल्यावर.

प्रभा, “वैद्यबुवा कायतरी द्या आम्हाला वाचवा. नाहीतर आम्ही मेलाव बघा.”

लता, “एवढ बरं करा. बेंदराला बैलं फुकट देईन.”

वैद्य बुवा, “एवढं झालंय तरी काय?”

उमा, “ खुजली झालेय. खाजवतंय खूप. मला वाटतं कुणीतरी कावशी घातलेय.”

वैद्यबुवा, “एवढंच ना, थांबा देतो औषध.”

( वैद्य बुवांकडील औषधं घेऊन त्या मागील गोठ्यात गेल्या. त्या औषधाचा घाण वास येत होता. ते त्यांनी नाक धरून अंगाला लावले. थोड्या वेळात खुजली थांबली. बरे वाटू लागले.)

उमा, “त्या जगण्याला आता बघतोच बघ.”

प्रभा, “तर काय? “

राजश्री,

 “ अगं, पण त्यानेच केलं कशावरून.”

लता, “ एवढ, धाडस हाय कुणात, त्या बीन घाट्याच्यातच ना.”

दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर जगन व त्याचे मित्र अजिंक्य व इतर सर्वजण मुलींना चिडवत होते.

जगन, “ काय अजिंक्य माकड कसं खाजवत.”

इतर मुले, “ खार, खार , खार खार.”

जगन, “ वावा.. ,वावा… ,”

उमा त्यांकडे रागाने पाहते. तेव्हा लता तिचा हात धरून शांत होण्यास सांगते.

लता, “ गप चल, इथं तमाशा नको. बघू काय करायचं ते.”

त्या वर्गात गेल्या.

…….. ……. …….


रविवार होता. सुट्टीचा दिवस गावाबाहेर माळावर मुले क्रिकेट खेळत होती. जगन व त्याचे मित्र देखील होते. माळावर बाजूच्या रानात सुकत घातलेले अंथरुण न्यायला लता व उमा आल्या होत्या. त्या दोघींनी त्यांकडे पाहिले. तेथील झाडावर मधाची पोळी होती.

उमा, “लता काय करायचं ग.”

 लता, “ द्यायचा दणका.”

उमा, “ पण आपण लपायचं कुठं ग.”

लता, “ते बघ जानू धनगराचं घोंगड वाळत घातलय त्यात.”

 उमा, “ मग दे की दणका.”

 लता, “ माझा नेम तुझ्या इतका बेस्ट नाही.”

 उमा दगड उचलून

“ मग घे.”

 तिने दगड मारला. व त्या पळत जाऊन घोंगडीत लपल्या. मव्हाच्या माशा मुलांच्या मागे लागल्या. चावू लागल्या. पोर सैरावरा पळू लागली. एकेकाचे तोंड सुजले. थोड्या वेळाने माशा शांत झाल्या. त्या घोंगडीतून बाहेर आल्या. बऱ्याच जणांना डॉक्टरकडे नेले. हे जेव्हा उमा व लताला कळले. तेव्हा त्या घाबरल्या. व देवाजवळ प्रार्थना करू लागल्या. ती मुले वाचलीत. इथून पुढे कुरघोडीचा डाव न करण्याचे त्यांनी ठरवले.

……….. ….. …….

क्रमशः पुढे.....










बुधवार, १ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ४

 अस्तित्व पटकथा भाग ४

क्रमश पुढे.......

संध्याकाळी शाळा सुटल्यावर शकू घरला जाताना लता दारात उभा होती. शकू येताच आतमध्ये जाऊन लता एक बाटली खिशातून घेऊन आली. व ती गुपचुप तिने शाकूकडे दिली. शकू घरला गेली.

इकडे शाळा सुटल्यावर राजश्री घरी आली. तिची आई वाती वळत होती. तिला

राजश्री, “ आई मला उद्या डब्यात प्रसादाचा शीरा दे. “

आई, “ शीरा, कशाला हवाय.”

राजश्री, “ पाहिजे एक मुलगी गरीबाची हाय. ती म्हणाली तिला शिरा खावासा वाटतो ग. मी म्हटले, उद्या आणते.”

आई, “ अगं, केव्हा पण करायचा का प्रसादाचा शीरा.”

राजश्री, “ ये, तू देणार की नाही बोल, दशमीला नैवेद्य करायला जोर असतो तुला, व मला द्यायला नाही.”

 इतक्यात बाहेरून राजश्रीचे बाबा आले. ते न्हाणीघरात पाय धुताना.

राजश्रीचे बाबा, “ अहो, ऐकलंत का?”

 आई, “काय ते?”

बाबा, “ उद्या नेवेद्य लागेल.”

आई, “केवढ्याचं करायचं.”

 बाबा, “ आपल रोजच्या सारखं, दशमी आहे हो वाडीवरल्या तुकाराम डोईफोड्याची, त्याची आवशी निवर्तली ना.”

 आई, “बर करते, पण वाण सामानास पैसे हवेत.”

राजश्रीचे बाबा, “ ठेवलेत तिथे डब्यात, त्यातून घ्या.”

आई, “ बर बरं.’

राजश्रीची आई तिच्याकडे पाहून हसली.

आई, “ देव पावला ग बाई तुला, देते जा उद्या, पण आता माझं ही एक काम करायचं.”

राजश्री, “ कोणतं गं?”

आई, “ अंगण झाडून काढ, व दोन – तीन घागरी पाणी त्या न्हाणीघरातील डेर्यात ओत. मगच मी तुझं काम करेन.”

राजश्री, “ पक्की जातीची बामणीन आहेस हं.”

आई, “ हो का, हे आपलं बरं आहे की, ती उमा बघ स्वयंपाक ही करते. नाहीतर तू, पोळ्या तरी जमतात का?”

राजश्री, “ जमतील की येत्या मे महिन्यात, दहावी झाली की उमा शिकवणार आहे. आम्हाला सगळं काही.”

आई, “ हो का, बरं झालं बाई, देव पावला म्हणायचा. एकदासा, “

राजश्रीने मुरका मारला. व ती कामाला लागली.

…… …… …..

 दुसऱ्या दिवशी शाळेला जाताना राजश्रीच्या आईने राजश्रीला एक डब्बा दिला. त्यात नैवेद्याचा शिरा होता. तो घेऊन ती शाळेला निघाली. वाटेत एक एक करत सर्व मैत्रिणी जमा झाल्या. वाडीवरल्या विठू मांगाच्या पोरीने एक बाटली त्यांना दिली. ती उघडून त्यांनी बघितली. थोडं वाटेवर बाजूला जाऊन उपवासाच्या शिऱ्यात त्यांनी ते थोडं पेय मिसळले. व त्या शाळेत गेल्या. जाण्यापूर्वी वाटेत सर्व योजना केली. शाळा भरली. प्रार्थना होऊन तासिका सुरू झाल्या. दुपार झाली. मधली सुट्टी झाली. वर्गातली मुले बाहेर गेली. जगन मागील बाकावर होता.

राजश्री, “लता कुणाला सांगू नकोस हा, माझ्या डब्यात नैवेद्याचा शिरा आहे म्हणून, नाहीतर सगळ्या संपवतील.”

त्यांचे बोलणे जगनने ऐकले.

लता, “ चल सांगत नाही, जरा बाहेर जाऊन येऊ व शिरा खाऊ.”

त्या बाहेर गेल्या. व खिडकीतून वाकून पाहू लागल्या. जगन जागेवरून उठला. व कोणी वर्गात नव्हते याचा अंदाज घेऊन राजश्रीच्या बॅगे जवळ गेला. व डब्बा काढून त्याने बकाबक शिरा खाल्ला.

जगन, “वाह, मस्त आहे.”

त्यानी खिडकीतून पाहिले व उमेला जाऊन सर्व हकीकत सांगितली.

लता, “ उमा , काम फत्ते झालं.”

 उमा, “ काय खाल्ला शिरा, मग आता काय जगन हवेतच.”

 थोड्या वेळाने बेल झाली. वर्ग पुन्हा भरले. इतिहासाचा तास चालू झाला. सर शिकवू लागले. जगनला थोड्या वेळानंतर धुंदी चढायला लागली. जगन जाग्यावरुन उठला.

जगन, “काय शिकवताय बोडके सर, इतिहास काय? मग मला एक विचारायचं आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याच उत्तर द्या.”

बोडके सर, “जगन्या शुद्धीवर आहेस ना, कुणाला बोलतोयस. “

 जगन, “तुला रे मास्तुर्या, सांग मला नेपोलियन बोनापर्टच्या आईचे नाव काय?”

बोडके सर, “जगन्या फालतू प्रश्न विचारू नकोस?“

जगन, “ मास्तुर्या, तूच प्रश्न विचारतोस ना, मग ज्याचा उपयोग नाही तो इतिहास का शिकवतोस.”

 बोडके सर, “ काय बोलतोयस तुला कळतेय का? भांग प्यालास काय?”

  जगन, “नाय, मी भांग प्यायलो.”

जगन तिथून उमेच्या जागेवर आला.

जगन, “ये उमे, आंबे चोर, सरला काकूंच्या व्हळीत आंबे लपवतेस काय? आंबे कुठे गेले याचा विचार करतेस का? मी चोरले, ते ग्वाड ग्वाड आंबे, तुला सांगणार नाही म्या कुठे लपवले ते? माळ्यावरच्या कनुगल्यात हा s s हा s s…..”

जगन धडपडत वर्गातून बाहेर पडला. व त्याने शाळेची घंटा वाजवली. मुलांना वाटले शाळा सुटली म्हणून ती सर्व घरला पळाली. मास्तर जगण्याच्या पाठी लागले.

बोडके मास्तर, “जगन्या भोपळ्या.,.. थांब दाखवतोच.” तो धडपडत शाळेतून बाहेर पडला. व गावात आला. गावात त्याला शंभू माळी दिसला. त्याला पाहून

जगन, “ ये शंभू, बागवान कुठला? दोन आंबे काय काढले पोरिंनी, त्यांना बोलतोस व्हय. हत्ती कुठला? राहिलेले आंबे काय मेल्यावर

 डोंबलावर बांधून फिरणार आहेस काय? म्हणून लेका वेशीवरल्या महादेवन तुला अपंग पोरं दिलंय बघ.”

हे ऐकताच शंभू माळी, “ जगन्या मला बोलतोस व्हय रं.”

असे म्हणून तो जगनच्या अंगावर धावून गेला. सर्व लोकांनी त्याच्या तावडीतून जगनला सोडवला. व जगनला उचलून घरी नेला. सर्व लोक जमा झालीत.

जगनची आई, “ काय झालं व पोराला.”

जगनचा बाप, “ दिसत नाही मूत् प्यायल्यावाणी बरळतोय, दिसतं नाही तूस.”

जगनची आई, “ आव, काय खाल्ल व पोरानं.”

जगन, “ काय नाही ग, प्रसादाचा शीरा खाल्ला बघ.”

जगन्याची आई, “ ये राजे, तूच कायतरी घातलीस बघं माझ्या पोराला.”

राजश्री घाबरली. ते पाहून

लता, “ ये जगन्याचे आई, त्याला काय आम्ही शिरा दिला नव्हता. चोरट्यांन चोरुन डब्बा खाल्ला असणार.”

जगण्याची आई, “काय मंतर घातलाय काय त्यात.”

 गर्दीतून एकजण

“ शिरा खाऊन का कोणी झिंगत का? हे तर दुसरच कारण हाय.”

 इतक्यात राजश्रीची आई, “ ऐ बाय, भटाच्या घरात कावून आम्ही घालू. व तुझ्या पोराला गुंगी चढायला तोच शीरा मी दशमीला दिला. ते आहेत ना नीट. मग तुपालंच पोरगं कसं झिंगल. व ये राजे, या मेल्यास शिरा का दिलास.”

राजश्री, “अगं आई मी नाही दिला. यानेच चोरला. चोरटा कुठला? अन् यानेच शंभू माळ्याचे आंबे पण चोरले.”

 जगनची आई, “ये बाय, कायपण आरोप करतेस. ग.”

उमा, “ जाऊन बघ जा, माळ्यावरील कनुगल्यात लपवलेत ते.”

इतक्यात शेजारील गुंड्या माळ्यावर गेला. व कनुगल्यातील आंबे काढून घेऊन आला. आल्यावर.

गुंड्या, “ हे बघा सापडले.”

शंभू माळी, “ जगन्या तू चोर व त्या पोरींवर नाव घालतोस व्हय रं. “

जगन्याच्या बा कडे पाहत.

शंभू माळी, “जगन्याच्या बाप्पा, द्या माझ्या आंब्यांचे पैसे.”

जगनचा बाप, “देत नाही जा. काय करणार?”

शंभू माळी, “कोर्टात खेचीन. तूस”

इतक्यात शकुंतला पाटलीन, “ ऐ शंभ्या, चार दिवसापूर्वी दंगा घातलास, अन् म्या माझ्या पोरीला भाजलं. मेल्या इथंन गप्प जा नाहीतर आंब्यासकट तुझं लोन्चच घालते बघ.”

लताची आई, “ दही चारा तेला, उतरलं.”

एक बाई, “ लताच्या आई, अनुभव हाय म्हणायचा.”

 लताची आई, “ डोंबलाचा अनुभव, आमचं हे प्यायलं, की दही काय दह्याचं रांजण जरी ओतला तरी त्या बाबाची काय उतरायची नाय.”

जगनला घरात बाजेवर झोपवले गेले. त्याला दही चारवले गेले. मुली खुदू खुदू हसत बाजूला गेल्या.

उमा, “ बघितलीस का? काजूची फेणी कशी चढली की नाही. जगनला, चला झालं काम.”

त्या बाजूला जाऊन हसू लागल्या. टिंगल करू लागल्या.

प्रभा, “जगन्या भारी बोलला. नाही.”

जया, “ये शंभू, हत्ती. हा.. हा …हा….”

 लता, “ मास्तरांची तर पॅन्टच निसटली. नेपोलियन बोनापार्टची आईचे नाव काय विचारल्यावर?”

उमा, “ये गप्प बसा, कोणीतरी ऐकेल, चला आता जाऊया.”

 त्या निघून गेल्या.

…. …… ….. ……

क्रमश पुढे .....


अस्तित्व पटकथा भाग ३

अस्तित्व पटकथा भाग ३

क्रमशः पुढे चालू ......


 दुसऱ्या दिवशी शाळेतील मधल्या सुट्टीत जगन मुलांसोबत खेळत होता. मुली शाळेच्या मैदानाजवळ असलेल्या वडाच्या पारावर बसलेल्या होत्या. उमा ही तिथे बसलेली होती. तिच्या पायाला औषध लावलेलं होतं. बाकीच्या मैत्रिणी बाजूला उभा होत्या.

प्रभा, “ जास्त दुखतंय का? कळा थांबल्या का?

उमा, “ थोडीशी चमक मारतेय अजून, मला कळलच नाही. उलातन चुलीत का घातलेय ते.”

लता, “ तुझी आई इतकी कठोर कशी गं.”

राजश्री, “ सावत्र आहे ना, म्हणून..”

उमा, “ तसं काही बोलू नकोस, माझ्यासाठी सगळं करतेय ती. लहान भावापेक्षा माझ्यावर जीव आहे तिचा. काल भाजलं पण औषधं ही तीनचं लावलं.”

जया, “हे आपलं बरं हाय की, आधी लाथा घालायच्या व नंतर जेवायला बोलवायचं. असं कोकिळेच प्रेम कशाला पाहिजे. कावळ्याच्या घरट्यात अंडी देणारं.”

उमा, “तस नाही हं, उलट मी कोकिळेच पिल्ल, ती कावळा होऊन सांभाळतेय.”

 जया, “ बर, ते सोडा, त्या जगन्याचं काय करायचं ठरवलंय.”

 उमा, “त्याला धडा शिकवायचा कसा? याचाच विचार करतेय.”

प्रभा, “बघ तो घोडा, चांगला दहावीला गेलाय. तरी लहान पोरात कसा हुंदडतोय. चाडगा पावटा कुठला.”

राजश्री, “याचं काय करायचं?”

लता, “ जरा तिकडे बघ, जगन्याची नजर कशी फिरतेय त्या कडेला उभारलेल्या त्रिकुटावर.”

जगन खेळताना तिथे शेजारी उभारलेल्या तिन मुलीतील हेमांगीकडे पाहून हसत होता.

प्रभा, “कोण त्या हेमांगी, सुशीला व सविता का?”

लता, “ ती हेमा बघ कुठे पाहतेय.”

जया, “ अगं, ती तर जगन्याकडे बघतेय.”

उमा, “ सापडलं, हे ऐका, मी सांगते ते करा आता. तो जाड्या अजिंक्य लाईन मारतो ना हेमावर. फक्त एवढंच करायचं.”

 असे म्हणून उमा आपल्या मैत्रिणी लता व जयाच्या कानात काहीतरी कुजबुजली . त्या हसल्या, व अजिंक्य खेळत असलेल्या ठिकाणी गेल्या. व त्याला ऐकू जाईल अशा कुजबुज करू लागल्या.

जया, “ काय ग लता हेमा कुणाची?”

लता, “ कुणाची म्हणजे, जगन्याची.”

जया, “मग आज्याचं काय?”

 लता, “ तो बसेल टिमकी वाजवत वाजंत्री होऊन लग्नात. जगन बघ किती फॉर्मात हाय.”

त्यांचे बोलणे अजिंक्यने ऐकले. व तो चिडला. व त्याने जगन्याकडे पाहिले. तो हेमांगीकडे पाहून हसत होता. इतक्यात शाळेची घंटा वाजली. सर्व मुले वर्गाकडे निघालीत. अजिंक्य जगन जवळ गेला. व त्याला लघवीला जाऊन येऊ असे म्हणाला. व त्याला शाळेच्या मुतारी मागील झाडीत घेऊन गेला. व म्हणाला, “जगन्या खिडम्या, हेमांगीवर लाइन मारतोस काय? थांब दाखवतोच तुला हिसका.”

 तिथे त्याला खूप बडवला. जगन ओरडू लागला. “ आई ग, मेलो.. मेलो…”

जगण्याची हाड खिळखिळी केल्यावर तो म्हणाला, “ ते काही माहित नाही मला, येत्या रक्षा बंधनला हेमांगीकडून राखी बांधून घ्यायची, नायतर तुला नदीतच बुडवतो बघ..

घाबरलेला जगन ‘ घेतो, घेतो’ म्हणाला.

थोड्या वेळाने लंगडत, लंगडत जगन्या वर्गात आला. त्याला बाईंनी विचारलं. “ काय झाले रे, पडलास काय?”

मॅडमकड पहात नाव सांगणार तोच शेवटचे अजिंक्यचे शब्द त्याला आठवले.”

“ यातलं एक जरी कुठे बोललास तर सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करीन.”

जगन, “ होय जरा घसरलो. “

तो जाऊन गुपचूप आपल्या बेंचवर बसला. त्याच्याकडे बघून मुली हसू लागल्या. इतक्यात कुंभाराची लता म्हणाली, “ हेमा मालिनी पावली वाटत.”

“ हो तर ड्रीम गर्ल आहे ना ती.”

सगळे हसू लागले.

मॅडम, “ सायलेंट , गप्प बसा.”

मॅडम शिकवू लागल्या. जगन समजून गेला. की अजिंक्याला कसे समजले ते.

..,….. …….. ………

पुढील प्रसंग

दुपारची वेळ, उमा, राजश्री, प्रभा, लता, जयश्री या सर्वजणी सरला काकूंच्या पिंजरातले आंबे काढून बघत होत्या. त्यातील पिकलेले घेऊन उरलेले झाकून ठेवले. हे सर्व करताना जगनंने पाहिले. पिकलेले आंबे घेऊन त्या बाजूच्या झुडपात घुसल्या. आंबे खाऊन झाडांच्या पानांना हात पुसून पुढे पाणवठ्यावर आल्या. तिथं हात, पाय तोंड धुवून आपल्या घागरी घेऊन परतल्या.

 काही वेळाने जगन घरातून एक पोतं घेऊन आला. त्याने राहिलेले आंबे त्या सरला काकूंच्या पिंजराच्या व्हळीतून काढून पोत्यात घेतले. व निघाला. जाताना त्याच्या मनात विचार आला.

जगन, ( मनात) “ जर का हे आंबे शंभू माळ्याला दिले , तर मला काय फायदा. यांना तर दोन- चार रपाटे बसतील. त्यापेक्षा घरीच नेतो. म्हणजे आपली चांदी होईल. यांना आंबे न मिळाल्याने यांचा पोपट होईल. व मला आंबे खायला मिळतील. दोन्हीकडून आपलाच फायदा.”

असा मनात विचार करत तो ते आंबे घेऊन घरी आला. व माळ्यावरील कनुगल्यात त्याने ते आंबे लपवले.

…… ……. …….

परत पाणी भरायला आल्यावर पाणवठ्यावर घागरी भरण्यासाठी पाणी लता व जया काढू लागली. उमा ते पाणी घागरीत ओतत होती. तिने नजरेने इशारा केला. राजश्री व प्रभा या सरला काकूंच्या शेतात गेल्या. तेथील गंजीत त्यांनी लपवलेले आंबे तपासले. पण काहीच सापडले नाहीत.

प्रभा, “अगं, ये आंबे नाहीत.”

राजश्री, “ काय म्हणतेस, थांब मी बघते.”

( तिने देखील तपासले. आंबे सापडले नाहीत.)

प्रभा, “ चोरले वाटतं कुणी?”

राजश्री, “ चल जाऊन सांगूया.”

 त्या दोघी पाणवठ्यावर गेल्या. व इशारा करुन सांगितले.

प्रभा, “ मुरंबा गेला ढगात.”

उमा, “ कोणचा ठग.”

राजश्री, “ मडक्याला किंवा तलवारीस विचार की.”

 लता व जया एकदम बोलल्या, “ आम्हाला काय माहित. चला बघू.”

 त्यांनी तिथे जाऊन तपासले. आंबे नव्हते.

उमा, “ जाऊ देत, चोरीचचं धन ते चोरीलाच जायचं.”

जयश्री, “ चोरीचं कसं, हिवाळ्यात दहा - दहा रुपये देतो म्हणून त्या शंभ्यानं आम्हाकडून अखंड बाग स्वच्छ करून घेतली. व अजून शेंबडा पैसे देतोय. दिवसभर दहा माणसांनी तरी स्वच्छ केली असती का? अन् त्यांना मजुरी द्यावी लागली असती तर.”

लता, “चला आता वेळ होतोय. घरची उगाच कालवा करायची.”

त्या पाणवठ्यावर आल्या. व आपापल्या घागरी घेऊन निघाल्या.

…….. ….. …….

पुढील प्रसंग

शाळेमध्ये वर्ग भरला आहे. शिक्षक येऊन शिकवून जात होते. मधली सुट्टी झाली. मुली होमवर्क करू लागल्या.

इतक्यात जगन शेजारी बसलेल्या संजूस

जगन, “ संजू तुला काय सांगू रे, काय आमच्या इथल्या शंभू माळ्याचा आंबा, लई गोड हाय बघ. अगदी चवदार, पिकल्यावर लई भारी लागतो बघ.”

संजू, “ तू खाल्लास काय?”

जगन, “ हो की खूप खाल्लेत, हल्ली आमच्या गावात आडीला खूप आंबे पिकतात बघ.”

त्याचे बोलणे बाजूच्या मुलींच्या कानावर पडत होते. त्यांचे लेखन थांबले. थोड्या वेळाने जगन बाहेर गेला.

लता, “ उमा, ऐकलस काय? अडीचे आंबे कुठे गेले ते.”

उमा, “ ऐकलं पण आणि चोर ही समजला.”

जयश्री, “ लांडगाच हाय मेला. काय पाठी लागलाय बघ. याला अजिंक्यचा प्रसाद कमी मिळाला वाटतं.”

प्रभा, “ दिसायला गोरा असला तरी, रुप राजाचं अन गुण कास्ताराचं आहेत बघ. याचं काय करूया.”

 उमा, “ राजे जा, त्या सातवीतल्या विठू मांगाच्या सकीला बोलवून आन् जा.”

 राजश्री, “ तिला कशाला गं,”

उमा, “ कळेलंच तुला.”

थोड्याच वेळात राजश्रीने जाऊन विठू मांगाच्या सकीला बोलवून आणले. ती दिसायला काळी पण साजरी मुलगी आल्यावर.

सकू, “काय ग उमाताई. कशाला बोलावलंस.”

उमा, “ तुझ्याकडे काम होते. एक.”

सकू, “काय ते गं.”

 उमा, “ कान कर इकडे.”

( उमा तिच्या कानात कुजबुजली.)

सकू, “ पण बाटली हवी.”

 उमा, “ जाताना या लतीच्या घराकडून जा. ती देईल बाटली.”

लताकडे पाहत.

उमा, “ लताबाई, भांड घ्यायला भंगारवाल्यासाठी ठेवलेल्या बाटलीतील एक बाटली हिला दे.”

लता, “देते की रोज एक येतेय घरात. वैताग आलाय नुसता. आवशीने तर काल भांडणच केलं, रोज बा पिऊन येतोय काय करेल.”

उमा, “ मग उद्या कळलंच की, कोण प्यालं ते.”

ती मुलगी निघून गेली.

उमा, “ राजू बाळ, प्रसादाचा शिरा उद्या मिळेल का?”

राजश्री, “ मिळेल की, उद्या आणते की, मला खूप आवडतो.”

उमा, “ आवडत असला तरी उद्या खायचा नाही हं, खाऊ घालायचाय, आण हो.”

राजश्री, “ मला समजलं नाही, “

उमा, “ समजेल उद्या, उगीच कुठल्या हेराने ऐकायला नको. लागा तुमच्या कामाला.”

..,. ….. …….


सोमवार, २३ मार्च, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २

अस्तित्व भाग २

क्रमशः पुढे........ चालू...

 गणपतराव, “ आता इथं लग्नाचं काढायची काही गरज आहे का ? ये बोल शंभ्या तुझं किती पैसे ते? आता मारतो तोंडावर तुझ्या”

( गणपत पाटील पैसे देतोय म्हंटल्यावर शंभू पुढे येतं होता. इतक्यात शकुंतला मधी बोलली.)

शकुंतला, “ अय , लई पैसे नाचवू नका, व ये शंभ्या एका रुपयाला जरी हात लावलास तर हात तोडीन, मग आंबे मोजायचे सोड तुला पाटवान सुद्धा धुवायला यायचं नाही. “

शकुंतला झटकन पुढे गेली. व नवऱ्याच्या हातातले रुपये हिसकावून घेतले.

शकुंतला, “ आणा इकडं ते वाण सामान आणायचं आहे.”

शंभु कडे पाहून तिने मुरका मारला. व त्याला म्हणाली,

“ शंभू महाराज , चला घर गाठा, आता. आंब्याच मुरून लोणचं झालं की पाठवून देऊ घरला.”

 शकुंतला उर्मिलेजवळ जात,

शकुंतला, “ चल ग कारटे, सुगंधा ती घागर घे आत, सकाळच्या पाळी कुणा कुणाची तोंड बघायला लागतात. चल नालायक कुठली.”

 बाकीचे सर्वजण आपापल्या मुलींना घेऊन घरी जातात. शंभू पण निघून गेला. थोड्या वेळाने शकुंतला पाटलीनीनं उमेला जेवायला वाढलं. ती जेवली, जेवण झाल्यावर.

शकुंतला, “ काय झालं का जेवून?”

 उमा, “ हो, झालं की.”

 शकुंतला, “ मग सांग, आंबे काढलेस की नाही.”

उमा, “ छे ग, कुठले आंबे. तो जगन्या थापाडा, काय पण सांगतोय.”

शकुंतला, “ हो का, मग शंभू काका तर ठारंच वेडा असणार. अन् तू तेवढी शहाणी माझी बाय ती.”

उमा, ( लाजत खाली मान घालून.)

हो.

( इतक्यात चुलीतील तापलेले उलातणे काढून जोराचा चटका उमेच्या पायाला दिला. ती ओरडली. काय झालं म्हणून गणपती पाटील पाळण्यावरुन खाली उतरुन आत आला. उमा रडत होती. तिच्या पायातून वेदना होत होत्या. ते पाहून. )

गणपतराव, “आवागलीस काय? अस तरण्या ताठ पोरीला कुणी भाजतं का?”

शकुंतला, “ हो अवागलेय, ही त्या शंभ्याला गंडवू शकेल मला नाही. सांग गेलतीस की नाही आंबे आणायला.”

उमा, “ नाही जायला, आबा वाचवा मला. आई बघा कशी मारतेय.”

शकुंतला, “ ये, या शेंड्या दुसऱ्या कुणाला तरी लाव.”

गणपतराव, “ अहो, एवढ म्हणते तर गेली नसेल. तुम्ही पण उगाच कुणाचं तरी ऐकून पोरीला मारता .”

शकुंतला, “ उगाच नाही मारत, एवढी दुधखूळी नाही मी. नव्या पोलक्यावरील हे आंब्याच्या जराचे डाग व गाभोळल्या आंब्याचा वास कळतो मला. मी पण घाट कोकणाचीचं आहे हो. मला खोटं बोलतीस, घरच्या आंब्याची झाडे नाहीत का? ते तिकडं कलमडलीस, मला विचारायच्या आधी बाहेर गेलीस तर डोकल्या मोडून ठेवीन. अन् कुणा पांगळ्याच्या गळ्यात बांधीन.”

( इतक्यात मागल्या दराने महादेवाच्या देवळातून आलेल्या म्हातारीला उमेच्या हुंडक्यांचा आवाज ऐकू आला. ती आत आली. उमेला रडताना पाहून तिच्याजवळ जात.)

आऊ, “ उमा, रडायला काय झालं? कुणी काय केलं? ते सांग मला.”

 उमा, “ आईनं भाजलं.”

 आऊ, “ काय भाजलं, गण्या ये गण्या.”

गणपतराव आत आले.

आऊ, “ काय चाललंय तुझ्या बाईचं. तिला म्हणावं म्हातारी जीत्ती हाय अजून. तुमच राज येऊ द्यायची नाही. माझ्या नातीला भाजती. जा म्हणावं माहेराला.”

शकुंतला, “ अहो, तुम्हाला सांगते, गप्प रहा म्हणावं, म्हातारीला. नाहीतर आता पोचवा मला माहेरी. “

आऊ, “तिथं ठेवलय, डबोलं तुझ्या बापानं. जा उकरून खा जा. पोरीला का भाजलस ते सांग आधी.”

शकुंतला, “ त्या देवळात जाऊन चकाट्या पिटण्यापेक्षा जरा नातीकडं लक्ष द्या म्हणावं. लोकांची आमराई उतरुन आलिया.”

 आऊ, “ कोण ,म्हणतं. “

शकुंतला, “ तो शंभ्या आला होता कोकलत, इथवर, नको ते बोलतं होता. कोण सहन करणार?”

आऊ, “ गावाला काय शेंडा न बुडका, तू का गं हलक्या कानाची.”

शकुंतला, “ हलक्या कानाची बरी असेन, बयेचा ड्रेस बघ, कसा डागाळलाय.”

म्हातारी, “ कशाऊन ते आंब्याचे डाग, तू सांगतेस म्हणून, बडी संशोधक झालीस की.”

 शकुंतला, “अहो, तुम्हासनी सांगते, त्या म्हातारीच्या तोंडाला कुलूप लावा. नाहीतर मी निघाले.”

आऊ, “ तू बरी जाशील. अन् ह्यो खटारा काय तुझी आवशी सांभाळलं काय?”

शकुंतला, “ तीनच ह्यो घाणा घातलाय, व मला इथं दिली.”

गणपतराव, “ ये बायांनो गप्प बसा आता. घरात शांती नंदू देत.”

तशा त्या दोघी गप्प बसल्या. उमेच्या मैत्रिणी दारा आडून वाकून बघत होत्या.

लता, “ काय झालं असलं ग.”

 जया गायकवाड, “ काय झालं म्हणजे, काकूला कळलंय, उमेला भाजलं नव्हं.”

 प्रभा, “ बिचारी उमा, हे सगळं त्या जगन्यामुळं झालंय.”

 राजश्री, “काय पण होऊदेत, त्या जगन्याला सोडायचा नाही.”

लता, “ सोडायचा तर नाहीचं, पण चांगली अद्दल घडवायची.”

…… ……. ….. ….

क्रमशः पुढे.....

मंगळवार, १७ मार्च, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १

 I Iश्री गणेशाय नमः ll

I lअस्तित्व ll

                                 - लेखक : निशिकांत हारुगले 

घाट कुंतल कोल्हापूर जिल्यातील दक्षिणेतील भाग, अपरान्त कोकण प्रदेशास लागून असलेला भाग, या भागातील हिरव्या गर्द झाडीत वसलेलं गाव आसगाव, गावाच्या बाहेर शंभू माळ्याच्या आमराईतील झाडावर उर्मिला ही गावातील गणपत पाटलाची मुलगी चढलेली होती. ती वरून आंबे तोडून खाली टाकत होती. झाडाखाली उभा असलेली गायकवाडची जया वरून टाकलेले आंबे झेलत होती. वाण्याची प्रभावती खालच्या अंगाला उतरणीवर उभा होती. ती वाटेवरून कोण येतं का ते पहात होती. नरसू भटाची राजश्री बाजूला उभा होती. तिचे हात पाय थरथर कापत होते. ती जयाला मधून मधून आटप म्हणत होती. थोड्या बाजूला झाडातील गेचक्यात उभा राहून कुंभाराची लता रस्ता निरखत होती. तिला शंभू माळी काठी घेऊन येताना दिसला. त्याच्या पाठोपाठ जगन हसत, खिदळत येत होता. शंभू माळी बडबडत होता.

शंभू : “आजकाल पोरांपेक्षा या पोरीच वांड झाल्यात. आंबे उतरुन खायला सोकावल्यात, मेली ती शाळा सकाळची कशाला ठेवली सरकारने या दिवसात? त्या मास्तरांनाही काम नको, हे बघ जगण्या खरंच गेल्यात त्या.”

 जगन : “होय काका, मी माझ्या कानांनी ऐकलंय. त्या आडावर पाणी भरायला आल्या होत्या. तेव्हाच त्यांचं ठरलंय. ती उर्मी त्यांची सरदार आहे बघा.“

शंभू : “ ती गण्या पाटलाची पोरगी ना, जन्मताच आईला खाल्ली, व आता पोपट होऊन माझे आंबे संपवतीय काय ? सोडतच नाही तिला. “

वळणावर शंभू माळी दिसताच लताने ‘कुहू, कुहू’ इशारा केला. आवाज ऐकताच उर्मिला झाडावरून लगेच खाली उतरली. तोपर्यंत काढलेले आंबे गायकवाडच्या जयाने उतरणीवर उभा असलेल्या प्रभेकडे दिले. ती वेगाने विहिरीकडे गेली. व सर्व आंबे एका घागरीत टाकले. व ती डोईवर घेतली. दुपारची वेळ होती. कोणी पाणवठ्यावर नव्हते. दुसरी कळशी काखेत घेऊन ती वाटेला लागली.

माळी व जगण्या बागेत यायच्या आत त्या सगळ्याजनी उतरणीवरून पाणवठ्यावर आल्या. व आपल्या भरलेल्या घागरी घेऊन वाटेला लागल्या.

बागेत आल्यावर ताजी पाने एका झाडाखाली पडलेली होती. तसेच एक कैरी देखील शंभू माळ्याला सापडली. ती घेऊन ते दोघे पाणवठ्यावर आले. मुलींकडे पहात.

शंभू माळी : “ए चोरांनो, आंबे काढून खाताय काय?”

जया : “ काय मामा, कुणाला चोर म्हणताय?”

शंभू माळी , “ कुणाला म्हणजे तुम्हाला, माझा आंबा उतरला नव्ह, पाडाला आलेला.”

लता, “ कोण म्हणतंय, आम्ही तर बाई अडावर पाणी भरताव. “

शंभू, “ मला जगन्यान सांगितलंय, काय ग उमा तू या चोरांची सरदार नव्हं. चल तुझ्या बापाकडं.”

उमा , “ माळी काका उगाच नको ते आरोप नको, पुरावा काय?”

शंभू, “ हा काय, जगन्या आहे की पुरावा.”

( खिडमुड्या जगन पुढे आला. आणि काका फुगवून दाखवू लागला. )

उमा, “ ये चल, माग सर, वार आलं तर उडून जाशील. हा पुरावा द्यायला, हा काय कॅमेरा आहे का फोटू?”

 शंभू, “ मुकाट्याने आंबे दे. नाहीतर चल तुझ्या बापाकडे.”

 उमा, “ जावा की मग वाट माहित आहे ना वाड्याची, काय कंदील घेऊन मुराळी पाठवून देऊ.”

जगन्या, “ बघा काका, कशी उलट बोलते तुम्हाला.”

जया, “ जगन्या , हाड पाहिजेत नव्हं जाग्याला की ढकलू विहिरीत. “

जगन मागे सरला. व काकामागे उभा राहिला.

जगन, “ बघा काका चोर ते चोर, आणि वर शिरजोर.”

शंभू, “ चला दाखवतोच तुम्हाला माझा हिसका, चला तुमच्या घरी. “

लता, “ जावा पुढे, येतो पाणी घेऊन आम्ही.”

 शंभू, “ कशाला, डोक्यावर ओतायला.”

 जया, “ हो बसा की मड्यागत , अखंड घागरच ओतते.”

 लता, “ घागर कशाला ओततेस, सरळ मडकच फोड की.”

शंभू, “ काय नालायक कारट्या आहेत. जीवावरच उठल्यात माझ्या. थांबा दाखवतोच, जातोच प्रत्येकीच्या घरला.”

 शंभू व जगन तावातावानेच निघाले.

…… ….. ….

प्रसंग दुसरा

शंभू माळी व गगन पुढे तावातावाने निघालेले पाहून

प्रभा , “ आता काय करायचं ग.”

उमा , “ शंकध्वनी करायचा त्या जगन्याच्या नावानं?”

प्रभा, “ पण आंबे कुठे ठेवायचे?”

लता, “ ठेवायचे की सरला काकूंच्या पिंजराच्या व्हळीत.”

राजश्री, “ आता ग काय करायचे? त्यो घरलाच निघालाय, आमचा अण्णा चेचणार मला.”

जया, “ ये भित्री भागुबाई, गप्प बस, ये लता व प्रभा दोघी जाऊन आंबे लपवा. पळा जावा लवकर, या शंभू काकाला सांभाळतो आम्ही, पण हे भित्र, गप्प बसलं तर बरं.”

उमा, “ राजे हे बघ, किती कुणी म्हटलं तर ही कोरट्याची फुलं दाखवायची. दुसरं काही नाही. समजलं, नाहीतर वकशील सगळं. बघतोच या जगण्याला, नाही याचा बाजा वाजवला, तर नावाची उमा नाही. चला आता.”

 मुली आपापल्या कामाला लागल्या.”

 लता व प्रभाने जाऊन आंबे लपवले. व त्या सर्वजणी आपापल्या घागरी पाण्याने भरून घेऊन घरी निघाल्या.

…… ………… ………

पुढील प्रसंग

उमेच्या घराच्या अंगणात शंभू माळी कालवा करत गेला. त्याच्या मागे जगन उभा होता.

शंभूने जोराने हाक मारली.

शंभू माळी, “ ये गण्या बाहेर ये, तुझ्या लाडक्या पोरीने वानर टोळी गोळा करुन माझी आंब्याची बाग उजाडली.”

उमेचे बाबा आत ज्योत्यावर पाळण्यावर बसून झोके घेत पानाचा विडा खात होते. शेजारी पाटलीन उभा होती. त्याचा आवाज ऐकून.

पाटील, “ हा शंभ्या आणि का कोकलत आलंय.”

पाटीलीन, “ काय माहित, चला तर बघू.”

ती दोघे घरच्या बाहेर येतात. पाठोपाठ त्याची आई सुद्धा येते.

पाटील, “ ये, शंभ्या कशाला कोकलत आहेस दारात येऊन.”

शंभू, “ वा, पाटील हे आपलं बरं हाय, तुमचं, तुमच्या पोरींनं गरीबांचं नुकसान करावं, व तुमची वर दमदाटी, नाय खपवून घ्यायचा मी, सगळ्या गावाला बोंबलून सांगणार तुझ्या पोरीची करणी.”

गणपतराव पाटील, “ ए शंभ्या, गप काय बोलतोयस.”

शंभू माळी, “ अरे , गावकऱ्यानो, बघा याच्या पोरीनं माझा आंबा उतरला. अन् हा बघा कसा पाटीलकी करतोय.”

गणपतराव, “ ए माझ्या पोरींन तुझा आंबा उतरला यासाठी काय पुरावा हाय?”

( मागल्या जगन्याला पुढे बोलावत)

शंभू, “ ए , जगण्या सांग तेला?”

जगन, “ हो, हो, मी माझ्या कानांनी ऐकलंय, त्या पाणवठ्यावर बोलत होत्या.”

गणपतराव, “ हे बघ, तू ऐकलास ना, मग त्यांना आंबे काढताना पाहिलंस का?”

 जगन, “ नाही बुवा.”

 गणपतराव, “ हे बघ, शंभू ऐकने व पाहण्यात चार बोटांचं अंतर असतं. व पाणी भरायला गेलेल्या मुली आंबे कशाला काढतील. तरी पण घरी आल्यावर बघू.”

शंभू, “ हे आपलं बरं हाय पाटील, मला सांगा, जवळ विहीर असताना तुमची पोर तिकडं पाणी भरायला कशाला गेली.”

शंकुतला, “ हे बघा, शंभू भाऊ, पोरींनं पाणी कुठं भरायच, ते आम्ही ठरवू, पोरींनं जर आंबे काढले असतील तर मी तिला शिक्षा करेन. आणि जर तिच्याकडे आंबे सापडले नाहीत तर मग तुलाच त्या आंब्याला उलटा टांगून नाय मिरचीची धुरी दिली तर नावाची शकुंतला नाय मी.”

तेवढ्यात त्या सर्वजणी एकामागोमाग एक हजर होतात. उर्मिलेच्या डोक्यावर पाण्याची घागर होती. तिच्या ओढणीच्या ओटीत काहीतरी होते. त्या सर्वजणी आपापल्या घागरी घेऊन उभा होत्या. राजश्रीच्या ओट्यात देखील काहीतरी होते. शंभूचा कालवा ऐकून गल्लीतील सर्वजण गोळा झाले होते. इतक्यात शंभू माळी म्हणाला, “ बघ, तिच्या ओट्यात काय ते?”

शकुंतला, “ कारटे कुठे उलतली होतीस. जवळ विहीर असताना तिकडे कशाला गेलतीस कलमडायला, आणि ओट्यात काय हाय?”

शकुंतला पुढे होणार तोच शंभू माळी पुढे झाला. व तिचा ओटा खुला केला. त्यातून कोरट्याची फुले खाली पडली. तशी डोईवरील घागर शेजारच्या सुलभा मावशीकडे देत.

उर्मिला, “ बघ ना ग, आई कसा हिसडा मारतोय, माझी फुलं पाडली बघ.”

तशी शकुंतला पुढे होत,

“ ये, गाभ्या फणसा, बघितलास नव्हं, फुलं होती ते. आणि चोर म्हणतोस व्हय र…. माझ्या पोरीला म्हसोबा, तुला सोलीन नारळ सोलल्यासारखा. दोन चार आंब्यापाई माझ्या पोरीला बोल लावतोस व्हय. जा पेटून पडू देत तुझी बाग ती, नाय ग माझी बाय ती रडू नकोस.”

शंभू, “ नाटकं करत्यात, ये राजे तुझ्याकडं असतील आंबे,”

( शंभू पुढे झाला. व त्याने राजश्रीच्या ओट्यावर हात मारला. तिच्या ओट्यातील चिंचा खाली पडल्या. तशी राजश्री रडू लागली. तेव्हा राजश्रीची आई बोलली.)

“ ये शंभ्या चिंचतला अन आंब्यातल फरक कळतोय की नाही. काय म्हणते मी, गोटीवानी डोळं दिल्यात ना देवानं. मीच सांगितल्या होत्या. वाटेवरील चिंचेच्या चिंचा अणायला. नालायक कुठला? भटाच्या पोरीला हात लावायला. सत्यनारायण तरी पावलं का तुला?”

 शंभू, “ लई खऱ्याच्या पुतळ्या असतील ना या, तर शपथ घ्यायला सांग.”

 उर्मिला, “ हो, घेते मी, माझ्या मेलेल्या आईची शपथं.”

 शंभू, “ काय बिलंदर आहे हो कारटी, मेलेल्या आईची शपथ घेतेय. या जित्या आईची घे.”

 शकुंतला, “ये मेल्या, माझ्या जीवावर उठलास होय. घेत नाय जा ती शपथ. तुझे आंबे गेले आडीत. जा शोध जा, माझ्या मरणावर उठलाय. जीवनाची रांगोळी केली मी या पोरीसाठी, हिचा वनवास नको म्हणून भनीमाग हा बिजोरा नव्हरा गळ्यात बांधला माझ्या. आणि आता तू आलास व्हय र, मुळावर माझ्या. गुमान जा, नाहीतर डोचकीचा आंबा फोडीन तुझ्या.”

क्रमशः पुढे .....


शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

चित्रपटाचे नाव : 🎬 कोकणकड्यावर सापडलेलं स्वप्न भाग ६

 चित्रपटाचे नाव : 🎬 कोकणकड्यावर सापडलेलं स्वप्न भाग ६


🎬 चित्रपट पटकथा – PART 4 (Final Act)

ACT 3 : प्रेमाची परीक्षा आणि विजय

(पाने अंदाजे 151 ते 300)

---

SCENE 51

EXT. सिंहगड – संध्याकाळ

सिंहगडावरची उंच कड.

खाली पसरलेलं पुणे शहर.

सूर्य हळूहळू मावळतोय.

आकाशात केशरी, सोनेरी, जांभळ्या छटा.

BACKGROUND SCORE : मंद, भावुक वायलिन.

संयोगिता कड्याजवळ उभी.

वाऱ्यामुळे तिचे केस हलके उडतायत.

डोळ्यांत खोल विचार.

राजवर्धन थोड्या अंतरावर उभा.

तो तिच्याकडे पाहतो – प्रेम, आदर आणि संयम.

क्षणभर शांतता.

संयोगिता (हळू आवाजात):

“राज…

माझं आयुष्य सोपं नाही.”

राजवर्धन जवळ येतो.

तिच्या बाजूला उभा राहतो –

पण अंतर राखून.

राजवर्धन (हसत, आत्मविश्वासात):

“म्हणूनच ते मला हवंय.”

संयोगिता त्याच्याकडे पाहते.

तिला हा उत्तर अपेक्षित नव्हतं.

संयोगिता:

“माझ्याकडे पैसा नाही…

नाव नाही…

आणि प्रश्न खूप आहेत.”

राजवर्धन:

“माझ्याकडे सगळं आहे…

पण समाधान नाही.

तू आहेस म्हणून ते मिळेल.”

संयोगिताच्या डोळ्यांत पाणी येतं.

ती खाली पाहते.

राजवर्धन (हळूच):

“मी तुझ्या आयुष्याची उत्तरं नाही…

पण प्रश्नांसोबत उभा राहीन.”

संयोगिता पहिल्यांदाच मनापासून हसते.

तो हसरा क्षण सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर स्थिरावतो.

CUT TO WIDE SHOT –

सिंहगड, मावळता सूर्य आणि दोन सावल्या.

...

SCENE 52

INT. सरकारी दवाखाना – दिवस

नेहमीची गडबड.

रुग्ण, स्ट्रेचर, आवाज.

संयोगिता कामात व्यस्त.

ती इंजेक्शन देते, फाईल तपासते.

कोपऱ्यात दोन नर्स कुजबुजतायत.

नर्स 1 (हसत):

“तो CEO रोज येतो म्हणे…”

नर्स 2:

“रोज एक ना एक कारण!

कधी रिपोर्ट, कधी भेट.”

संयोगिता ऐकते.

ती थोडी लाजते.

कामात लक्ष देण्याचा प्रयत्न करते.

नर्स 1 (खोडकर):

“ताई…

आम्हाला पण असाच कोणी शोधून द्या.”

संयोगिता (हसत, थोडी लाजत):

“कामावर लक्ष द्या.”

पण तिच्या चेहऱ्यावरचं हास्य

लपवता येत नाही.

दवाखान्याच्या दारात –

राजवर्धन उभा.

फक्त तिला पाहायला आला आहे.

दोघांची नजर भिडते.

क्षणभर वेळ थांबतो.

---

SCENE 53

MONTAGE – राजवर्धनचे गंमतीशीर प्रयत्न करतो.

🎵 हलके, मजेशीर, रोमँटिक संगीत 🎵

— MBA क्लास.

राजवर्धन मागच्या बाकावर बसलेला.

विद्यार्थी त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात.

— प्रोफेसर प्रश्न विचारतात.

प्रोफेसर:

“ROI कसा काढाल?”

राजवर्धन उठतो – आत्मविश्वासात.

राजवर्धन:

“सर… ROI म्हणजे…

Risk Of Investment?”

पूर्ण क्लास हसतो.

— संयोगिता पुढच्या बाकावर बसलेली.

ती डोळे फिरवते.

— कॅन्टीन.

राजवर्धन टिफिन उघडतो – रिकामं.

राजवर्धन (स्वतःशी):

“अरे देवा…”

तो संयोगिताचा डबा उचलतो.

संयोगिता:

“अहो! तो माझा आहे!”

राजवर्धन (चावत):

“आता आपलाच आहे.”

ती रागावते.

तो पळतो.

ती त्याच्या मागे.

— लायब्ररी.

राजवर्धन पुस्तक उलटं धरून वाचतो.

संयोगिता:

“राज…

ते पुस्तक सरळ धर.”

तो लाजतो.

ती हसते.

🎵 संगीत संपतं 🎵

---

SCENE 54

EXT. कॉलेज – पाऊस

जोरदार पाऊस.

कॉलेज सुटलंय.

विद्यार्थी धावतायत.

संयोगिता उभी.

छत्री नाही.

पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर पडतायत.

अचानक एक छत्री तिच्यावर येते.

ती पाहते –

राजवर्धन.

राजवर्धन (नाटकी आवाजात):

“आज CEO नाही…

आज ड्रायव्हर आहे.”

ती हसते.

संयोगिता:

“ड्रायव्हर?”

राजवर्धन:

“हो…

आयुष्यभर सोडायला.”

दोघे पावसात चालतात.

छत्रीखाली थोडीशी जवळीक.

पार्श्वभूमीत कॉलेज, पाऊस आणि प्रेम.

---

SCENE 55

INT. राजवर्धनचे घर – दिवस

भव्य बंगला.

मोठे झुंबर.

संगमरवरी फरशी.

राजवर्धनचे आई-वडील सोफ्यावर बसलेले.

आई – प्रतिष्ठित, कडक.

वडील – शांत, निरीक्षक.

आई:

“ती कोण आहे?”

राजवर्धन समोर उभा.

पहिल्यांदाच थोडा गंभीर.

राजवर्धन:

“ती नर्स आहे…

पण तिचं मन सोन्यासारखं आहे.”

आई:

“आपल्या घरात…?”

राजवर्धन (ठामपणे):

“माझं भविष्य.”

आई स्तब्ध.

घरात शांतता.

वडील राजवर्धनकडे पाहतात –

आदराने.

BACKGROUND SCORE : गंभीर, निर्णायक.

FADE OUT.

---

---

🎬 चित्रपट पटकथा – सविस्तर भाग

ACT 3 : प्रेमाची खरी परीक्षा

(SCENE 56 ते SCENE 60)

---

SCENE 56

INT. संयोगिताचं घर – गाव – संध्याकाळ

मातीचं जुनं घर. भिंतींवर तडे.

दाराजवळ देव्हारा – पण दिवा विझलेला.

आई चुलीजवळ बसलेली.

भाऊ कोपऱ्यात पुस्तक हातात, पण लक्ष नाही.

दार उघडतं.

राजवर्धन आत येतो.

थोडा संकोचलेला, पण चेहऱ्यावर आदर.

संयोगिता मागे उभी.

डोळ्यांत भीती.

आतून वडील डगमगत येतात — दारूचा वास.

वडील (तिरस्काराने हसत):

> “काय बघतोयस?

हा काय… श्रीमंत जावई?”

राजवर्धन नम्रपणे वाकतो.

राजवर्धन:

> “नमस्कार काका.”

वडील जोरात हसतात.

वडील:

> “नमस्कार?

माझ्या मुलीला श्रीमंत नवरा हवा म्हणून

हे नाटक आहे का?”

आई डोळे खाली घालते.

संयोगिताचे डोळे भरतात.

वडील (संयोगिताकडे बोट दाखवत):

> “हिला काय कळतंय प्रेम?

पैसे पाहून फसली आहे!”

संयोगिता रडत पुढे येते.

संयोगिता:

> “बाबा… थांबा ना…”


राजवर्धन हळूच संयोगिताचा हात धरतो.

तो घट्ट नाही — आधार देणारा.

राजवर्धन शांत आवाजात:

> “काका…

मी श्रीमंत म्हणून नाही आलो.

तुमच्या मुलीवर प्रेम आहे म्हणून आलोय.”

क्षणभर शांतता.

वडील डगमगतात…

आणि खुर्चीत कोसळतात.

संयोगिता राजवर्धनच्या खांद्यावर रडते.

BACKGROUND SCORE : हळवी पण मजबूत

---

SCENE 57

EXT. गाव – रात्र

चंद्रप्रकाश. गाव झोपलेलं.

राजवर्धन वडिलांना खांद्यावरून आधार देत चालवतो.

दारूची बाटली बाजूला पडलेली.

CUT TO:

INT. प्राथमिक आरोग्य केंद्र – रात्र

डॉक्टर तपासणी करतो.

डॉक्टर:

> “दारू सोडली नाही तर परिणाम वाईट होतील.”

CUT TO:

INT. समुपदेशक खोली – दिवस

वडील समोर बसलेले.

डोळ्यांत अपराधी भाव.

समुपदेशक

> “तुमच्या रागामागे वेदना आहेत…

पण बदल तुमच्याच हातात आहे.”

CUT TO MONTAGE:

– राजवर्धन दर आठवड्याला भेटतो

– वडील दारू नाकारतात

– आई पहिल्यांदा हसते

– संयोगिता दूरून पाहते… आशेने

वडील (हळू आवाजात, स्वतःशी):

> “माझ्या मुलीला मीच हरवलं…”

BACKGROUND SCORE : आशावादी

---

SCENE 58

INT. राजवर्धनचे घर – रात्री

मोठं घर. भव्य, पण वातावरण तणावाचं.

राजवर्धनचे वडील संतप्त.

वडील (राजवर्धनचे):

> “जात विसरलास?

समाज विसरलास?”

राजवर्धन ठाम उभा.

राजवर्धन:

> “मी माणूस पाहतो बाबा.

जात नाही.”

वडील:

> “लोक काय म्हणतील?”

राजवर्धन:

> “लोक उद्या विसरतील…

पण मी स्वतःला नाही विसरू शकत.”

आई बाजूला उभी.

डोळ्यांत पाणी.

आई (हळू):

> “मुलगा बरोबर आहे…”

वडील शांत होतात.

खिडकीबाहेर पाहतात.

कट.

---

SCENE 59

EXT. कॉलेज – दिवस – गुढीपाडवा

रंगीत रांगोळ्या.

गुढ्या उभारलेल्या.

हलकी उत्सवी गडबड.

संयोगिता सुंदर साडीमध्ये.

केस मोकळे.

पहिल्यांदा खऱ्या आनंदात.

ती मोबाईल काढते.

स्वतःचा फोटो काढते.

TEXT टाईप करते:

> “गुढीपाडवा शुभेच्छा 🌸”

SEND.

CUT TO:

INT. राजवर्धन – ऑफिस

मोबाईल वाजतो.

फोटो पाहतो.

त्याच्या चेहऱ्यावर हसू…

डोळे ओलावतात.

राजवर्धन (स्वतःशी):

> “मी पुन्हा प्रेमात पडलो…”

BACKGROUND SCORE : प्रेमळ, हलकं

---

SCENE 60

MONTAGE – समाजाचा विरोध

– गावात कुजबुज

– नातेवाईकांचे फोन

> “विचार करून कर…”

– अफवा पसरतात

– सोशल मीडियावर टोमणे

CUT TO:

– मित्र संयोगिताच्या बाजूने उभे

– कॉलेजमधील मैत्रिणी तिला घट्ट मिठी मारतात

– राजवर्धनचा मित्र खांदा थोपटतो

VOICE OVER – संयोगिता:

> “सगळे विरोधात असताना…

काही लोक साथ देतात,

आणि तेच पुरेसे असतात.”

राजवर्धन आणि संयोगिता —

दूरून एकमेकांकडे पाहतात.

न बोलता…

पण ठाम.

FADE OUT.

---


अस्तित्व पटकथा भाग ९

  अस्तित्व पटकथा भाग ९ अस्तित्व पटकथा भाग ९ मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film, क्रमशः पुढे चालू ........ उमाचा रिझल्ट ला...