Inter / Day / ashvinchya ajobanche ghar / pargav
केस पुसत तानाजीराव व अश्विन हॉल मध्ये येतात.
सावित्री आई भाजी कुडत असते. त्यांना पाहून
सावित्री आई :
सुमे ए सुमे, दुध अन नाष्टा दे ग.
सुमा :
हा देते.
सावित्री आई :
( अश्विनला )
काय झाली का रपेट. कस वाटलं गाव. बदललेय ना.
अश्विन :
मस्त.
( सुमा नाष्टा घेऊन येते. अश्विन दूध गडबडीने पिऊ लागतो. )
सावित्री आई :
अरे, हळू गडबड कसली लागलीय.
( इतक्यात तात्या आजोबा येऊन बसतात. )
सुमा :
बाईसाहेब, डाळ संपलीय.
सावित्री आई :
अग, कालच आणली होती ना.
सुमा :
अहो, पोळ्यांची डाळ म्हणते.
सावित्री आई :
पोळ्यांची होय.
सुमा :
अहो, उद्या अक्षय तृतीया ना.
सावित्री आई :
काय उद्या, माझ्या लक्षातच नव्हत ग.
सावित्री आई :
अहो, उद्या नेवैद्य द्यायला हवा, काळूबाईला नवस बोलले होते. की अश्विनला बरं वाटलं की नेवैद्य देईन म्हणून.
सावित्री आई : ( सुमनला )
हे बघ उद्या लवकर ये, मी पोळ्या करते. तू बाकीचं आवर , उद्या खांद्याच्या वाडीला नैवेद्य द्यायला हवा.
अश्विन :
खांद्याचवाडी, कुठे आली ही.
सावित्री आई :
आहे जवळच, तू पण जा उद्या आजोबांसोबत. तुला पण माहिती पाहिजे बाबा आपल्या कुलदेवते बद्दल.
अश्विन :
कुलदेवता म्हणजे काय ग आजी?
सावित्री आई :
अरे, प्रत्येक घरातील लोकांची नितांत श्रद्धा एखाद्या देवतेवर असते. ती आपलं प्रत्येक संकटातून रक्षण करते. आपली काळूबाई ही कुलदेवता आहे. उद्या जा आजोबांसोबत, कळेल सगळ.
(भाजीचे ताट सुमनकडे देत. )
तुला पण माहिती हवी बाबा.
सावित्री आई :
अहो घेऊन जा त्याला पण सोबत.
तात्या आजोबा ( तानाजीराव ) :
( दूध घेत. )
हा चालेल, नेईन त्याला पण.
( अश्विन हसतो. )
Cut to ….
….. …… …..
Day / outer – Inter / khandyachi vadi gramdevta mandir
मंदिर आवारात गाडी पोहोचते. अश्विन व आजोबा गाडीवरून उतरतात. देवळात जातात. अश्विन घंटा वाजवतो. नैवेद्य पुजाऱ्याकडे देतो. नैवेद्य दाखविल्यावर बाहेर आल्यावर.
आजोबा एका वाटेला जाताना
आजोबा :
हा चल अश्विन.
अश्विन :
नैवेद्य दाखवला ना, आता आणखीन कुठे?
आजोबा :
चल, अजून दोन ठिकाणी दाखवायचा आहे.
( आजोबा व अश्विन रानातील मारुतीस नेवैद्य दाखवतात. व रानातील वीरगळ असणाऱ्या ठिकाणी येतात. तेथील एका वीरगळीची पूजा करून नैवेद्य दाखवतात. )
अश्विन :
हा आणखी कोणता देव?
तात्या आजोबा :
अरे हा देव वीरगळ आहे.
अश्विन :
वीरगळ म्हणजे काय?
आजोबा :
वीर पुरुष मेल्यावर उभारलेला स्तंभ म्हणजे वीरगळ.
अश्विन :
म्हणजे थडगेच ना.
आजोबा :
नाही रे.
अश्विन :
मग काय असते वीरगळ?
आजोबा :
तिकडे बघ काय आहे?
अश्विन :
( त्या दिशेला पहात. )
तो तर एक किल्ला आहे ना?
आजोबा :
हे बघ, पूर्वी या ठिकाणी आपले पूर्वज राजाची चाकरी करत असत. त्या वेळी लढाया होत असत. आपली ही जन्मभूमी वाचवताना त्यावेळी शत्रूशी लढताना मरण पावणाऱ्या शूर वीरास वीरमरण आले. तर त्याची स्मृती व बलीदान आपल्या लक्षात राहावे म्हणून एक दगडी स्तंभ उभारला जायचा. ती आहे वीरगळ. रक्षण करणारा तो देव. म्हणून आपण या वीरगळींना पुजतो. आपल्या पूर्वजांनी सुद्धा बलिदान दिलेय हा
अश्विन :
अशा वीरगळ प्रत्येक ठिकाणी असतात का?
आजोबा :
हो, आणखीन सांगायच म्हणजे यामधे देखील प्रकार आहेत.
अश्विन :
ते कोणते आजोबा?
आजोबा :
ते तुला मी घरी गेल्यावर सांगेन.
चल, आता नमस्कार कर बघू.
( अश्विन नमस्कार करतो. व ते निघतात. त्यावेळी गीत वाजू लागते. ‘ वीरगळ, विरकल्लू नमो नम: हा नमो नम:.
तुझं देवरूपराया नमो नम:,
रक्षण धर्म, गो स्त्री संपत्ती जीव रे,
तू देव राया रे. देवराया.
जय जय विरकल्लू नमन तुझं देवा रे .. )
Cut to ……
…… ….. ……
No comments:
Post a Comment