Night. कोल्हापूर बस. राधानगरी बस स्टॉप ८.०० o’clock.
कोकणातून कणकवली सांगली बस निघालेली आहे. ती बस अण्विकाचे कुटुंब पकडते.
आण्विका व आई एका शिटवर बसलेल्या आहेत बसमध्ये. तिचा भाऊ राहुल शेजारील सिटला धरून उभा आहे. वडील पुढील बाकावर बसले आहेत.
बस कोल्हापूरच्या दिशेने निघालेली आहे.
तिचे बाबा तिच्याकडे पाहत आहेत.
तिचा नाराज चेहरा त्यांना सर्व काही सांगत आहे.
अनुच्या मनात अनेक विचार चालू आहेत.
आपल कसं होणार? या प्रसंगाने घरची आपल्या लग्नाला परवानगी देतील काय? असे प्रश्न तिच्या मनात येत आहेत.
तिला राधानगरी पोलिस स्टेशन मधील सर्व घटना आठवू लागते.
फ्लॅश बॅक
राधानगरी पोलिस स्टेशन
इन्स्पेक्टर राजवीर, आता सगळी प्रोसेस पूर्ण झाली आहे. आपण जाऊ शकता. आपली मुलगी आपणास मिळालेली आहे.
ईशान अन्विकाकडे पाहत असतो.
पोलिस स्टेशनच्या बाहेर आल्यावर
ईशान, ती उपाशी असेल आपण इथे जवळ कुठेतरी जेवण करूया का?
आण्विकाचे बाबा, काही नको. झाली तेवढी मदत पुरे. आता आमचं आम्ही बघतो. या आता तुम्ही.
ईशान, आता सापडली ना अनु. मग.
आण्विकाचे बाबा, हो सर सापडली. पण बदनामी ही झाली आमची, त्याच काय? संकटात झालीच तुझ्याच मुळें सापडली होती. आता दूर राहा तिच्यापासून…
आण्विका, अस काय म्हणताय बाबा.
बाबा, तू तर काहीच बोलू नकोस. तुला तर घरी गेल्यावर पाहतो.
चला आता शेवटची गाडी भेटते का पाहू.
ते निघालेले असतात. ईशान एका गरीब मुलासारखा अगतिक चेहरा करून तिच्याकडे पाहू लागतो. ती सुद्धा रडत निघालेली असते.ती सुद्धा मागे वळून त्याच्याकडे पाहू लागते.
आण्विकाची आई तिच्या हाताला धरून ओढत असते.
ब्रेक लागतो, बस थांबते.
आण्विका आपल्या विचार चक्रातून बाहेर येते.
आण्विकेची आई, ह चल आता आपला थांबा आला.
ती खाली उतरतात.
बस पुढे सी बी एस ला जाते.
Cut. To….
…… …… ……. ……..
Night. ईशानची शासकीय निवास रूम. Inter
ईशान आपल्या रूमवर येतो. शांतपणे तो आपल्या बेडरूममध्ये जातो.जाताना त्याला तेथील कर्मचारी, सर जेवण लावू.
ईशान, नाही नको. भूक नाही.
ईशान आपल्या रूम मध्ये जाऊन रडत आपल्या बेडवर बसतो.त्याला डोळ्यापुढे अण्विका दिसत असते.
… …… ……. …… …….
Next day, ईशान आपल्या घरी.
ईशान फोन करतो.
आण्विकेच्या मोबाईल वर.
तिकडे तिची आई फोन उचलते.
आण्विकेची आई, हॅलो कोण.
ईशान, अनुं कशी आहे.
आण्विकेची आई, आपण कोण?
ईशान, मी ईशान,
आण्विकेची आई, ठेवा फोन परत फोन करू नका. व ती ठेवते.
ईशान हॅलो हॅलो करत राहतो.
ईशान पुन्ह फोन लावतो. फोन कट केला जातो.
ईशानला काही सुचत नसते.
ईशान, स्वप्नीलला फोन करतो.
रिंग वाजू लागते.
स्वप्नील फोन उचलतो. ईशान त्याच्याशी संवाद साधतो. व घडलेली हकीकत सांगतो.
स्वप्नील, हे बघ टेन्शन घेऊ नकोस. होईल नीट. जरा शांत रहा.
इतक्यात तिथे रेवती येते.
रेवती, कुणाचा फोन आहे.
स्वप्नील, ईशानचा.
रेवती, काय म्हणत होता.
स्वप्नील रेवाला सगळ घटना सांगतो.
रेवती, आपल्याला जायला हवं.
स्वप्नील, हो. पण आधी कॉल तरी दिदिला कर.
रेवती लगेच फोन लावते.पण फोन बंद असतो.
तेव्हा ती मावशी म्हणजे अणुच्या आईच्या फोनवर कॉल करते.
आण्विकेची आई फोन उचलते.
अणुची आई, हॅलो.
रेवती, मावशी कशी आहेस.
अणुची आई, आहे बरी.तू कशी आहेस.
रेवती, आहे ठीक.अनु दीदी कुठे आहे? तिचा फोन लागत नाही.
अन्विकाची आई, आहे इथे तिच्या रुममध्ये.
रेवती, जरा तिच्याकडे दे.
आण्विकेची आई, हा देते.
आण्विकेची आई तिच्या रुमकडे जाते. आण्विक शांत बसलेली असते.
आई, हा घे फोन, रेवाचा आहे. आण्विका जवळ फोन ठेवून ती खाली जेवण खोलीकडे जाते.
आण्विका फोन घेते. व रडू लागते.
रेवती, अग अस रडायला काय झालेय. सुटका झाली ना तुझी. अग एवढी धाडशी तू अन् कशी काय अडकलीस.
आण्विका, काय सांगू, अग अचानक त्यांनी हल्ला केला. मला कळलंच नाही.
आण्विका, अग, पण आई बाबा चिडलेत. मला सगळ अवघड वाटतंय. आता वाटत नाही मला की ते लग्नाला परवानगी देतील आमच्या.
रेवती, अस कस देणार नाहीत. बघते मी.दोन दिवस थांब माझे शेवटचे दोन पेपर देते व येते.
आण्विक, लवकर ये.
रेवती, हा बाई येते.
….. ….. ….. …..
nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com
No comments:
Post a Comment